AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल, मुख्यमंत्री आणि शरद पवारांची उपस्थिती, मविआचे शक्तिप्रदर्शन

एकीकडे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असतानाच, दुसरीकडे शिवसेनेकडून राज्यसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.

शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल, मुख्यमंत्री आणि शरद पवारांची उपस्थिती, मविआचे शक्तिप्रदर्शन
sanjay raut and Sanjay pawar nominationsImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: May 26, 2022 | 1:51 PM
Share

मुंबई – राज्यसभा निवडणुकांसाठीच्या राज्यातील सहा जागांसाठीच्या राजकीय नाट्यानंतर, अखेरीस शिवसेनेकडून आज संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह निम्मे मंत्रिमंडळ यासाठी आज विधीमंडळात दाखल झाले होते. एकीकडे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असतानाच, दुसरीकडे शिवसेनेकडून राज्यसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. ३० मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असून, १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे.

कोण आहेत संजय पवार

शिवसेनेचे पहिले उमेदवार राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा परिचय सर्वांना आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार अशीही त्यांची ओळख आहे. दुसरे उमेदवार संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक आहेत. १९८९ साली ३३ वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी आहे. तीनदा ते कोल्हापूर महापालिकेत नगसवेक म्हणून निवडून आलेले आहेत. महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांनी निभावलेली आहे. कोल्हापुरातील प्रश्नांची जाण असणारा, लढावू कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

शिवसेनेला दोन जागा निवडून आणण्याचा विश्वास

राज्यातील सहा राज्यसभा जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी २०१६ साली संख्याबळावर शिवसेनेकडून संजय राऊत, काँग्रेसकडून पी चिदम्बरम, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर भाजपाकडून विकास महात्मे, विनय सहस्रबुद्धे आणि पियुष गोयल हे तिघे असे सहा जण निवडून आले होते. यावेळी मात्र संख्याबळानुसार भाजपाचे दोनच खासदार निवडून येऊ शकतील. तर महाविकास आघाडीकडे या जागेसाठी ४१ असे मतांचे गणित असल्याने सहावा उमेदवार नेमका कुणाचा निवडून येणार, यासाठी राजकीय चुरस आहे. भाजपाकडे या जागेसाठी अपक्षांसह २७ मते आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचा दावा प्रबळ मानण्यात येतो आहे. संजय राऊत यांनीही सहावा राज्यसभा खासदार हा शिवसेनेचाच असेल असे स्पष्ट केले आहे.

छत्रपती संभाजीराजेंनी ऑफर नाकारली

त्यापूर्वी या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी छत्रपती संभाजीराजे यांनी घोषित केली होती. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, मगच त्यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी देूऊ, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी शिवबंधन बांधण्यास यावे, असा निरोपही संभाजीराजेंना पाठवला होता. मात्र कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न करण्याची भूमिका घेतलेल्या संभाजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. भाजापानेही अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे छत्रपती निवडणुकीतून माघार घेणार अशीही चर्चा आहे.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी

तर राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या राज्यसभेसाठी पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली आहे. दिल्लीच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिल्याचे सांगण्यात येते आहे.

Follow Us
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.