AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
उदय सामंत
| Updated on: Dec 10, 2024 | 4:03 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान आता मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार आणि इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना अजूनही गृहमंत्रिपदाबाबत आग्रही आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. मीडियामधून चर्चा आहे की येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं मी ऐकतो आहे. 14 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत.  कोणाला कोणतं खातं मिळेल? हे येत्या दोन दिवसांत तुम्हाला कळेल तोपर्यंत तुम्ही सस्पेन्स ठेवा. रोज सकाळी मीडियावाले सांगतात, आम्हाला गृह खातं पाहिजे, पण अशा कुठल्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही.सन्मानपूर्वक मंत्रिपदाचे वाटप होईल, असं सामतं यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता  आहे, असं म्हटलं होतं. यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममतादीदींकडे नेतृत्व गेलं पाहिजे असं शरद पवार साहेब म्हणाले होते, हा खरा काँग्रेसचा अपमान आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका यशस्वी होत नाहीत, हा ठपका नेत्यांनी ठेवला आहे. हा काँग्रेसचा झालेला अपमान आहे त्यामुळे आम्ही या संदर्भात काय बोलणार?  राहुल गांधी यांचे नेतृत्व काढून ते आता जर ममता बॅनर्जी यांच्याकडे येणार असेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व कमकुवत आहे, असं महाविकास आघाडी दाखवत आहे, अशी प्रतिक्रिया सामतं यांनी दिली आहे.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन