AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…

नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे, आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आणि कोणाला नव्या मंत्रिमंडळात संधी मिळणार त्याचे यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
उदय सामंत
| Updated on: Dec 10, 2024 | 4:03 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान आता मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार आणि इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना अजूनही गृहमंत्रिपदाबाबत आग्रही आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत देखील त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. मीडियामधून चर्चा आहे की येत्या 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं मी ऐकतो आहे. 14 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत.  कोणाला कोणतं खातं मिळेल? हे येत्या दोन दिवसांत तुम्हाला कळेल तोपर्यंत तुम्ही सस्पेन्स ठेवा. रोज सकाळी मीडियावाले सांगतात, आम्हाला गृह खातं पाहिजे, पण अशा कुठल्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही.सन्मानपूर्वक मंत्रिपदाचे वाटप होईल, असं सामतं यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता  आहे, असं म्हटलं होतं. यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममतादीदींकडे नेतृत्व गेलं पाहिजे असं शरद पवार साहेब म्हणाले होते, हा खरा काँग्रेसचा अपमान आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका यशस्वी होत नाहीत, हा ठपका नेत्यांनी ठेवला आहे. हा काँग्रेसचा झालेला अपमान आहे त्यामुळे आम्ही या संदर्भात काय बोलणार?  राहुल गांधी यांचे नेतृत्व काढून ते आता जर ममता बॅनर्जी यांच्याकडे येणार असेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व कमकुवत आहे, असं महाविकास आघाडी दाखवत आहे, अशी प्रतिक्रिया सामतं यांनी दिली आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.