AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या बापाचंही नाव बदला..; औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून AIMIM चा शिवसेनेवर पलटवार

ज्याठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं नाव खुलताबादवरून बदलून रत्नपूर ठेवावं, अशी मागणी शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली. त्यावर आता AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

तुमच्या बापाचंही नाव बदला..; औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून AIMIM चा शिवसेनेवर पलटवार
Sanjay Shirsat and Imtiaz JaleelImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2025 | 10:28 AM

औरंगजेबच्या कबरीवरून अद्याप वाद सुरूच आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी औरंगजेबच्या कबरीच्या ठिकाणाचं नाव (खुलताबाद) बदलण्याची मागणी केली. त्यावर आता AIMIM ने प्रत्युत्तर दिलं आहे. AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय, “आता उरलंय तरी काय? आपल्या बापाचंही नाव बदलून घेतलं पाहिजे.” ज्याठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं खुलताबाद हे नाव बदलून रत्नपूर करण्याची मागणी शिरसाट यांनी केली होती. त्यावर इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

संजय शिरसाट याविषयी म्हणाले, “औरंगजेबाने आपल्या ठिकाणांची नावं बदलली होती. औरंगजेबाची कबर खुलताबाद याठिकाणी आहे. परंतु इंग्रजांच्या काळात ते रत्नपूर म्हणून ओळखलं जात होतं. काही लोकांना औरंगजेबावर प्रेम उसळून येतंय. परंतु आपल्याला आपली संस्कृती वाचवावी लागले. आम्ही औरंगजेबाची प्रॉपर्टी हिसकावून घेत नाही आहोत. आम्ही आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे दौलताबादचंही खरं नाव देवगिरी असं आहे. तिथे राजा राम देव राय यांनी राज्य केलं होतं. हा त्यांचा वारसा आहे. ते नावसुद्धा बदलायला हवं. आम्ही कोणती नवी मागणी करत नाही आहोत. औरंगजेबाने काबिज केल्यानंतर या ठिकाणांची नावं बदलली होती. आता तेच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर याबाबतचा प्रस्ताव देणार आहोत. विधानसभेतही आम्ही हा प्रस्ताव आणू.”

शिरसाट यांच्या या मागणीवर AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “तुम्ही शहरांची, इमारतींची, रस्त्यांची नावं बदलत आहात. आता जर नावं बदलण्याची मालिका सुरूच झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या. आता अजून राहिलंय तरी काय? सांगून टाका की आम्हाला हे नाव आवडलं नव्हतं, आता हे नाव बदलणार. इथल्या शहरांची नावं बदलत आहात, परंतु गुजराच्या अहमदाबादमध्ये तुमचा बाप बसलाय का?”

हे सुद्धा वाचा

“हिंमत असेल तर गुजरात आणि अहमदाबादची नाव का बदलत नाही? सांगा मोदी आणि शाह यांना. बोला की गुजरातमध्ये अहमद भाई चांगलं वाटतं का? इथे तुम्हाला अहमदनगर पसंत येत नाही. ज्या लोकांचे विचार खालच्या पातळीचे असतात, ते अशाच प्रकारे खालच्या दर्जाचं राजकारण करतात. शिकलेली व्यक्ती शहराच्या विकासाबद्दल बोलणार. परंतु काही लोकांचे विचार असेच असतात आणि ते अशाच पद्धतीची वक्तव्ये करतात. जग कुठे चाललंय आणि ही लोकं अजून तिथेच आहेत”, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.