AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क येथे मोठ्या थाटात साजरा झाला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक आले होते. यावेळी शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

सत्ता आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
| Updated on: Oct 12, 2024 | 8:34 PM
Share

शिवसेनेच्या दसरा मेळाव्या उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार आणि केद्र सरकारवर जोरदार टीका केली. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील शिवरायांच्या पुतळा पडल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिवरायांचे स्मारक देखील तुम्हाला करता आले नाही. आपले सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजाचं मंदिर बांधल्या शिवाय राहणार नाही अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला. पण अंमलात आणली ती शिवाजी महाराजांनी. त्यांच्यावरही आप्तस्वकीय आले होते. त्यांनी विचार केला नाही. त्यांनी चालून येणाऱ्यांचा शिरच्छेद केला. आपल्यालाही असाच शिरच्छेद करावा लागेल. आपण जय श्रीराम बोलतो. पण पुराणात राम होऊन गेले. श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून पाळतो. रामाबरोबर वानर सेना होती. आपण त्यांना दे मानतो. आमच्या शिवाजी महाराज कोण होते. फार पूर्वी नाही, तेव्हा जे स्वराज्यावर चालून आले, त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतो. आपलं काय झालं असतं कुणाला माहीत नाही. रामाने जसै दैत्य मारले. तसे शिवाजी महाराजांनी राक्षस आणि दैत्य मारले. अफजल खान हा दैत्यच होता असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू

उद्धव ठाकरे यावेळी त्वेषाने म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. नालायकांनो पुतळा पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आमचं दैवत आहे. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो. तसं आम्ही त्याच मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार. जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. दुसरा कोणता राजा पृथ्वीवर असा झाला नाही. आज 400 वर्षांनंतर आज जय भवानी म्हटले तरी मुर्दाही उठून जय शिवाजी म्हणले असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.