‘शिवराज्याभिषेक दिन’ सर्व महाविद्यालयांत साजरा होणार, ठाकरे सरकारच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंकडे सुपूर्द

संभाजीराजे यांनी उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सरकारच्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंना देण्यात आली.

'शिवराज्याभिषेक दिन' सर्व महाविद्यालयांत साजरा होणार, ठाकरे सरकारच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंकडे सुपूर्द
शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत उदय सामंतांकडून संभाजीराजेंना भेट
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 10:04 PM

मुंबई : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. यावर्षीपासून राज्यातील सर्व महाविद्यालये, खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. त्याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सरकारच्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंना देण्यात आली. त्यामुळे 6 जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन यंदा राज्यभरात साजरा केला जाणार आहे. (ShivRajyabhishek Din will be celebrated in all universities and colleges in the state)

राज्यातील सर्व महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याबाबत ठाकरे सरकारकडून अध्यादेश काढण्यात आलाय. या दिवशी शिवकालीन विषयांवर महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती सामंत यांनी दिलीय. राज्य सरकारच्या या उपक्रमाबद्दल आभार मानतानाच संभाजीराजे यांनी या निर्णयाचं स्वागतही केलंय. हा दिवस खरंतर राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा. महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती आजच्या पिढीला मिळायला हवी. महाराजांच्या आजार आणि विचारांचा प्रसार व्हायला हवा. ही त्याचीच सुरुवात असल्याचं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य व्हायचंय?

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसोबत जोडले जाण्यासाठी संभाजीराजे यांनी एक लिंक ट्वीट केली आहे. त्यामाध्यमातून शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसोबत जोडलं जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय. “शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारो शिवभक्तांनी व्यक्त केली, त्याप्रमाणे पुढील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्याच ध्येय उद्देश्याने शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्य करत आहे. समिती सोबत जोडून कार्य करण्यासाठी पुढील लिंक वरती आपली संपूर्ण माहिती भरावी”, असं आवाहन संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. संभाजीराजे यांनी दिलेली लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeU9fLmxPm-Hvy_Nvmm3Rg-LXFAIxVPk_V8SYabIhhW_SPpRw/viewform

ठाकरे सरकारला अल्टिमेटम

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला अजून 5 गोष्टी सांगितल्या आहेत. या 5 गोष्टींवर 7 जूनपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही कोरोना वगैरे पाहणार नाही. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु. मी स्वत: या आंदोलनात उतरणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचं वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या : 

छत्रपतींचे वंशज, मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख योद्धा, जाणून घ्या खासदार संभाजीराजेंची राजकीय कारकीर्द

Sambhajiraje Chhatrapati : “6 जूनपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार”

ShivRajyabhishek Din will be celebrated in all universities and colleges in the state

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.