AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजपने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली”, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “फडणवीसांच्या हातात सत्ता गेल्यापासून…”

महाराष्ट्राला विचारांची आणि राजकारणाची संस्कृती आणि संस्कार आहेत. हे सर्व बिघडवण्याचे काम भाजपने केले आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

भाजपने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले फडणवीसांच्या हातात सत्ता गेल्यापासून...
| Updated on: Oct 27, 2024 | 4:22 PM
Share

Sanjay Raut On Devendra Fadnavis : “राजकारणात वैयक्तीक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तीक शत्रूत्वाला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस हे आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तीक शत्रू म्हणून पाहत नाही”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले, असा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, भाजपसह वांद्र्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली. महाराष्ट्राला विचारांची आणि राजकारणाची संस्कृती आणि संस्कार आहेत. हे सर्व बिघडवण्याचे काम भाजपने केले आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

“भाजपने राजकारणात वैयक्तिक शत्रूत्वाला सुरुवात केली”

राजकारणात वैयक्तिक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तिक शत्रूत्वाला सुरुवात केली. राजकारणात विचारांची लढाई विचारांनी व्हावी, हा महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. राजकारणात भूमिकांवर, विकास कामांवर चर्चा व्हावी. वैयक्तीक हेवेदावे, शत्रूत्व राजकारणात असून नये, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा संस्कार यशवंतराव चव्हाणांपासून, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यापर्यंत कायम होता. मात्र, भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले, असा आरोप संजय राऊतांनी केला.

राजकीय वैर राजकारणातच ठेवले पाहिजे, ती विचारांची लढाई आहे. त्यात वैयक्तिक शत्रूत्व आणू नये, कोणचेही कुटुंब उद्ध्वस्त करू नये, असे माझं मत आहे. मात्र, दुर्दैवाने भाजप हे सर्व करत आहे. फडणवीस आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तिक शत्रू म्हणून पाहत नाही, असे संजय राऊत म्हणाले

“रामदास आठवले बंगल्यात राहतात, पण समाजाचे हाल होतात”

“दलित, शोषित आणि वंचित सामाजाचे नेतृत्व करणारे नेते दुर्दैवाने फक्त स्वतःचा विचार करतात. मात्र, समाजाला काय मिळाले, याचा विचार कोणीही करत नाही. सत्ताधाऱ्यांचे गुलाम म्हणून त्यांनी समजाला बांधून ठेवले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करण्याच्या नावाखाली त्यांनी समाजाला लढत ठेवले. रामदास आठवले यांना काही मिळाले नाही, असे म्हणता येणार नाही. ते अनेक वर्षे मंत्री आहेत. ते चांगल्या बंगल्यात राहतात. समाजाचे मात्र हाल होत आहेत. मात्र, आता हे सर्व जनतेला समजले असून जनता आता महाविकास आघाडीसोबत आहे”, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....