AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही देशाचे गृहमंत्री, मग भीती कसली? निडरपणे वागा, संजय राऊतांनी अमित शाहांना डिवचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौऱ्यावर असताना, ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यावर संजय राऊतांनी तीव्र टीका करत, "गृहमंत्र्यांना भय वाटण्याचे कारण काय?" असा सवाल केला.

तुम्ही देशाचे गृहमंत्री, मग भीती कसली? निडरपणे वागा, संजय राऊतांनी अमित शाहांना डिवचले
| Updated on: Oct 05, 2025 | 11:04 AM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील सध्या शिर्डीत आहेत. आज सकाळी ११ वाजता साई दर्शनाने अमित शाहांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर लोणी (प्रवरानगर) येथे कारखान्याच्या नूतनीकरणासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमापूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट सवाल केला आहे, तुम्ही गृहमंत्री आहात. मग इतकं भय वाटण्याचे कारण काय,? असा सवाल उपस्थित केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

जर त्यांच्या तिघांमधील भांडण मिटवायचे असतील तर त्यांना बंद दाराआडच बैठक घ्यावी लागेल. त्यांची भांडण ही बंद दाराआडच मिटवावी लागेल. देशाचे गृहमंत्री, निधड्या छातीचे, कश्मीरमधून ३७० कलम हटवणारे, शिवसेनेशी मुंबईत दोन हात करु पाहणारे, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष फोडून दाखवणारे, सोनम वांगचूकला अटक करणारे असे आपले गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात नगर जिल्ह्यावर आहेत. ते देशाचे गृहमंत्री आहेत. आपल्याकडे लोकांची सुरक्षा हा विषय आहे. तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता, त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नये, काळे झेंडे दाखवू नये म्हणून अटक करता, असे संजय राऊत म्हणाले.

तुम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच कारवाई केलेली नाहीत ही देखील तुमची भीती आहे. शेतकरी येऊ देणार नाही, किंवा ते अंगावर येतील अशी भीती तुम्हाला आहे. त्यामुळे अशा भयग्रस्त राज्य कर्त्याला देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का,” असा सवालही संजय राऊतांनी केला.

ते फार काळ चालणार नाही

लोकशाहीने आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. त्यांना लोकांचं आदोलन नको आहे. त्यांना लोकांची भीती वाटते. ते गुजरात मॉडेल चालवत आहे. तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता. त्यांनी तशी काही घोषणा केली आहे का, ते आपपल्या जागेवर काम करत होते. त्यांना पोलीस येतात आणि घेऊन जातात. कुठे घेऊन चालले सांगत नाही. हा महाराष्ट्रात काय प्रकार सुरु आहे. तुम्ही गृहमंत्री असाल मग गृहमंत्र्यासारखे निडर, निर्भीडपणे वागा. लोकांना सामोरे जा. त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्या. हा पळपुटेपणा कशासाठी. फडणवीसही असेच वागतात. खोटे गुन्हे दाखल करण, अटक करणं यावरच राजकरण सुरु आहे. ते फार काळ चालणार नाही,” असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक