AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिंदे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो आणि थोडं काय झालं की…”, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल. आपली लढाई मुंबईसाठी आहे, ती लढाई जिंकायची. मराठी माणसाची ताकद, आपल्याला दाखवा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

शिंदे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो आणि थोडं काय झालं की..., उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
| Edited By: | Updated on: Jun 16, 2025 | 12:35 PM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील शिवसेना भवनात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंनी शिंदे गटाला ‘चिंधीचोर मिंधे’ असे म्हणत त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल, असे आवाहन केले.

मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘चिंधीचोर मिंधे’ असे संबोधले. “चिंधीचोर मिंधे भाजपसोबत गेला, मी ठरवलं असतं तर भाजपसोबत गेलो असतो, पण मला भाजप विरोधात लढायचं आहे,” असे ठाकरे म्हणाले. शिंदे यांच्या दरे येथील भेटीवरूनही त्यांनी टोला लगावला. “मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो… घरगड्याची शेती बघा शेतीत हेलिकॉप्टर संपत्ती मालकापेक्षा जास्त… थोडं काय झालं की गावाला जाऊन बसतो,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर उपरोधिक टीका केली.

मुंबई अदानीच्या घशात घालू द्यायची नाही

“जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा मुंबई महानगरपालिकेत जीव अडकला आहे. हाच भाजप आणि मिंधे मुंबई अदानीच्या घशात घालू पाहत आहे, पण आपण मुंबई अदानीच्या घशात घालू द्यायची नाही. त्यासाठी लढाई लढायची आहे,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. ही लढाई मुंबईसाठी असून ती जिंकायचीच असे ते म्हणाले. मराठी माणसाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. आता आपण काँग्रेससोबत आहोत. ठीक आहे. पण एकेकाळी नेहरूंना वाकवणारा हा महाराष्ट्र आहे”, याची आठवण त्यांनी करून दिली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आपल्या आजोबांच्या योगदानाचा संदर्भही दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी माझ्या आजोबांनी आंदोलन केलं, त्यांचा मी नातू आहे. मी मुंबईसाठी लढाई लढणार आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल

सध्याच्या राजकीय समीकरणावर बोलताना, “आता आपण काँग्रेस सोबत आहोत ठीक आहे. पण एकेकाळी नेहरुंना वाकवणारा हा महाराष्ट्र आहे. मोरारजी देसाई यांना देखील आपण वाकवलं होतं,” अशी आठवणही त्यांनी करून दिली. भाजपला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद आपल्याला दाखवावी लागेल. आपली लढाई मुंबईसाठी आहे ती लढाई जिंकायची आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत आपल्याला मुंबई आणि मराठी माणसाची ताकद दाखवावी लागेल,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मराठी मतदारांना एकजुटीचे आवाहन केले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.