Skymet Weather Monsoon 2022 : औंदाही वरुणराजा चांगला बरसणार, बळीराजाला सुखावणारं स्कायमेटचं पहिलं भाकीत

भारतातील विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या स्कायमेट या हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपनीकडून मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनविषयी अंदाज व्यक्त करताना स्कायमेटने सांगितले आहे की, सुरुवातील मान्सून हा नेहमीप्रमाणेच असणार आहे. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी 880.6 मिमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

Skymet Weather Monsoon 2022 : औंदाही वरुणराजा चांगला बरसणार, बळीराजाला सुखावणारं स्कायमेटचं पहिलं भाकीत
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:12 PM

मुंबईः भारतातील विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या स्कायमेट (Skymet) या हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपनीकडून मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनविषयी अंदाज व्यक्त करताना स्कायमेटने सांगितले आहे की, सुरुवातील मान्सून (Monsoon) हा नेहमीप्रमाणेच असणार आहे. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी 880.6 मिमी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कंपनीकडून 2022 या वर्षामधील मान्सूनचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. स्कायमेटला आगामी मान्सून ही प्रारंभी ‘सामान्य’ असण्याची शक्यता आहे. या वर्षी बरसणारा मान्सून हा जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी 880.6 मिमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

स्कायमेटकडून 21 फेब्रुवारी रोजीही मान्सूनचा अंदाज जाहीर केला होता, त्यांच्या या पूर्वीच्या प्राथमिक अंदाजामध्येही मान्सून हा नेहमीसारखाच बरसणार असा अंदाज लावला होता, त्यानंतही त्यांनी तोच आपला अंदाज ठेवला आहे. स्कायमेटचे सीईओ योगेश पाटील यांच्या मते पॅसिफिक महासागरातील नैऋत्य मान्सून ही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे मान्सूनचे वारे बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असे सांगण्यात आले आहे.

मुसळधार पावसाची शक्यता

मान्सून हा सुरुवातील सामान्य अगदी नेहमीसारखा असला तरी काही काळ गेल्यानंतर अचानक जोरदारपणे पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतरही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्सून जुलैनंतर मान्सूनच्या वातावरणात प्रचंड मोठे बदल होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यामुळे मासिक पर्दन्यमानात मोठे बदल होणार असल्याचे स्कायमेटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या राज्यांना पावसाची कमतरता

भौगोलिक परिस्थितीनुसार राजस्थान आणि गुजरातसह नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि ईशान्येकडील त्रिपुरा या राज्यांना संपूर्ण हंगामामध्ये पावसाची कमतरता असणार आहे, त्यामुळे परिस्थिती धोक्याची होऊ शकते असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच, केरळ आणि कर्नाटकात जुलै आणि ऑगस्टपासून मान्सूनचे प्रमाण कमी होणार आहे.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील शेती आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित असणाऱ्या शेतीसारख्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. तर पहिल्या टप्प्यात उत्तरार्धापेक्षा मान्सून चांगला होईल अशी अपेक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंनी कारणावर बोट ठेवलं

Retail Inflation: महागाईचे घाबरवणारे आकडे! किरकोळ बाजारातील महागाई गेल्या 17 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर

Raj Thackeray Thane Speech : भोंग्ये हटवण्यासाठी राज ठाकरेंची डेडलाईन ते मोदींकडे दोन मोठ्या मागण्या, वाचा ठाण्यातल्या सभेतले 12 मोठे मुद्दे

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.