AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे ‘जय वीरू’ची जोडी, असं कोण म्हणालं…

अमृता फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, 'शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे जय वीरूची जोडी आहे.

शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे 'जय वीरू'ची जोडी, असं कोण म्हणालं...
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 9:56 PM
Share

पंढरपूर: साऱ्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची जोरदार चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीचे अमृता फडणवीस यांनी कौतूक केले. अमृता फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे जय वीरूची जोडी आहे.

म्हणजेच ही जोडी म्हणजे ये दोस्ती हम कभी नही तोडेंगे अशा पद्धतीची त्यांची जोडी असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सांगितले.

एकादशीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांनी पंढरपूर दौरा केला असता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांच्या कामाचेही त्यांनी कौतूक केले.

त्यांच्या कामाची पोचपावती देत असतानाच त्यांनी शोले चित्रपटातील जय विरु या दोघांची जोडी ज्या प्रमाणे आहे. त्याच प्रमाणे शिंदे आणि फडणवीस यांची जोडी असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलताना वारकरी आपले दैवत आहेत, तेच आपले अन्नदाता आहेत असंही त्यांनी सांगितले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. एकादशीसारख्या उत्सवामुळे आपले राज्य वेगळे असल्याचे सांगत त्यांनी आपला महाराष्ट्र संपन्न आणि समृद्ध व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या अमृता फडणवीस यांनी एकादशीनिमित्त पंढरपुरातील वारकऱ्यांसोबत टाळ, मृदंग आणि फुगडी खेळून एकादशीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

अमृता फडणवीस यांना शिंदे आणि फडणवीस यांना जय वीरुची उपमा दिल्यामुळे त्यांच्या या वाक्याची जोरदार चर्चा होती. अमृता फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत दिंडीमध्ये सहभाग नोंदवल्यानेही त्याचीही जोरदार चर्चा झाली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.