AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते आठ वर्षांनंतर जेलमधून परतले आणि बॅनरबाजी झाली, चर्चा तर होणारच

राष्ट्रवादीचे माजी आमदार जेलमध्ये गेले होते. तब्बल आठ वर्षानंतर ते परत आले. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले.

ते आठ वर्षांनंतर जेलमधून परतले आणि बॅनरबाजी झाली, चर्चा तर होणारच
| Edited By: | Updated on: Mar 23, 2023 | 1:13 PM
Share

माढा, सोलापूर : एखादा नेते आरोपाखाली जेलमध्ये गेला की कार्यकर्ते शांत होतात. पण, ते परत आल्यास पु्न्हा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो. असा काहीसा प्रकार नुकताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाबतीत घडला. ते जेलमधून परत आल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नागपुरातील त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. असाच काहीसा प्रकार मोहोळ येथे दिसून आला. राष्ट्रवादीचे माजी आमदार जेलमध्ये गेले होते. तब्बल आठ वर्षानंतर ते परत आले. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले.

न्यायालयाने जामीन मंजूर केला

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना तुरुंगात जाव लागलं. गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ते गेली ८ वर्षे तुरुंगात होते. रमेश कदम यांना नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला.

अब आगए…

रमेश कदम यांचे समर्थक अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपक पवार या समर्थकाने लावलेला डिजिटल बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे. लगाओ अब कितना भी दम…! अब आगए रमेश कदम! आपल्या हक्काचा माणूस पुन्हा आलाय. असा आशय फलकावर लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचा फोटोदेखील लावण्यात आलाय.

मोहोळमध्ये कदम समर्थन अॅक्टिव्ह होणार?

रमेश कदम हे माजी आमदार आहेत. त्यामुळे या भागात रमेश कदम यांना मानणारे बरेच कार्यकर्ते आहेत. पण, सेनापती जेलमध्ये गेल्यापासून ते शांत होते. आता आठ वर्षांनंतर रमेश कदम हे पुन्हा परत आले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. रमेश कदम यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या नावाची बॅनरबाजी करण्यात आली.

इकडे नागपुरात अनिल देशमुख अॅक्टिव्ह झाले आहेत. ते त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत आहेत. तसेच रमेश कदम हे आता त्यांच्या भागात अॅक्टिव्ह होतात का, हे पाहावं लागेल. त्यांचे काही कार्यकर्ते जोमात आले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.