AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेसाठी ‘या’ गावाने घेतला कर्नाटकात जाण्याचा निर्णय, रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही..

शाळेतील मुलांसाठी दोन शिक्षक असूनही आणि विद्यार्थी पुरेसे असूनही अजूनही गावामध्ये पक्की शाळा बांधली गेली नाही.

शाळेसाठी 'या' गावाने घेतला कर्नाटकात जाण्याचा निर्णय, रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही..
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 06, 2022 | 9:38 PM
Share

सोलापूर: महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद प्रचंड टोकाला गेला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर कन्नडिग्गांची तोडफोड केली आहे. तर महाराष्ट्रातही जशास तसे उत्तर देण्यात आल्यानंतर हा वादा आणखी विकोपाला गेलाय. त्यातच महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकात जात असताना त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतरही हा वाद वाढत गेला आहे.

एकीकडे कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रातील जनतेचा आवाज बुलंद होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी मात्र कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मांडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मात्र आम्ही महाराष्ट्रात का जात आहोत त्याची कारणं सोलापूर जिल्ह्यातील गाावांनी दिला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गावामध्ये पक्के रस्ते झाले नाहीत तर काही गावांमध्ये विजेचा, पाण्याचा प्रश्न जैसे थे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे आता अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातील जिल्हा परिषदेची शाळा भरते मंदिरामध्ये भरत असल्याने आंदेवाडी ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याचा ठराव मांडला आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातील जिल्हा परिषदेची शाळा अजून मंदिरामध्येच भरते आहे. गावामध्ये 80 विद्यार्थी असूनही आंदेवाडीमध्ये अजून शाळा नाही.

शाळेतील मुलांसाठी दोन शिक्षक असूनही आणि विद्यार्थी पुरेसे असूनही अजूनही गावामध्ये पक्की शाळा बांधली गेली नाही. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याबाबतचा ठराव केला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

त्यामुळे गावातील गावातील नागरिकांनी आम्हाला गावात रस्ते, वीज, पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी गावातील नागरिकांनी सांगितले की, आमच्या भागात एकही रस्ता नाही. काही दिवसांपूर्वी आमच्या गावातील एक पेशंट रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच दगावला होता आणि त्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे रस्ते खराब असण्याचे.

2020 साली गावामध्ये जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात पुराचा फटका बसला होता. त्यावेळी गावामध्ये ना कोणत्या आमदारांनी ना कोणत्या खासदारांनी भेट दिली होती. त्यामुळे आमच्याकडे नेहमीच दुर्लक्षे केले जाते असा ठपकाही नागरिकांनी राजकारणातील लोकांवर ठेवला आहे.

Follow Us
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता...
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता....
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला...
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....