AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राकडून सूडनाट्य मात्र क्रियेला प्रतिक्रियेची मर्यादा पाळा, जयंत पाटलांचा नेत्यांना खोचक सल्ला

क्रिया प्रतिक्रिया जास्त उमटायला लागल्या आहेत . दोन्ही बाजूने त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत आणि सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये. अशा शब्दात आज जयंत पाटील यांनी राज्यात सुरु असलेल्या सूड नाट्यावर मार्मिक प्रतिक्रिया दिली .

केंद्राकडून सूडनाट्य मात्र क्रियेला प्रतिक्रियेची मर्यादा पाळा, जयंत पाटलांचा नेत्यांना खोचक सल्ला
जयंत पाटील यांचा भाजपला इशाराImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 7:45 PM
Share

सागर सुरूवसे, प्रतिनिधी, सोलापूर : राज्यात सध्या ना भाजप दम धरेनाय ना शिवसेना. इकडून राऊत (Sanjay Raut) आणि तिकडून सोमय्या (Kirit Soamaiyya) हा रोजचा वाद ऐकून लोकांनाही कंटाळ आलाय. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्र कायम सर्वांचा आदर करून काम करणारे राज्य आहे , सर्वांनी टोकाची भाषा बोलणे टाळले पाहिजे . सध्या राजकारणात दुसऱ्याचा सूड उगवणे हा जो नवा प्रकार दिल्लीला नवे सरकार आल्यापासून सुरु झालेला आहे . याच्यामुळे क्रिया प्रतिक्रिया जास्त उमटायला लागल्या आहेत . दोन्ही बाजूने त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत आणि सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये. अशा शब्दात आज जयंत पाटील यांनी राज्यात सुरु असलेल्या सूड नाट्यावर मार्मिक प्रतिक्रिया दिली . यावेळी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया देणाऱ्या राज्यातील सत्तेतील सहकाऱ्यांनाही टोले लगावले .

चव्हाणांच्या आवाहनावर पाटलांची प्रतिक्रिया

राज्यात सध्या तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले तरी यांच्यातच सध्या जोरदार फोडाफोडी सुरू आहे. कधी काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडत आहे. यावर एकमेकांचे पक्ष फोडू नये असा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला होता. यावर बोलताना मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देणे अयोग्य आहे. मात्र हे पक्ष सोडणारे नेते भाजपमध्ये जाणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना जयंत पाटील यांनी दिली . गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसची काही पदाधिकारी राष्ट्रवादीत गेल्यावर काँग्रेसनेही राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता .

नाना पटोले यांना जयंत पटलांचा टोला

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा जयंत पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला . नाना पटोले यांनी माहिती घेऊन बोलावे , राष्ट्रीय प्रश्नाबाबत राष्ट्रीय नेत्यांना बोलूदेत आपण स्थानिक असून आपल्याला दुसऱ्या राज्यातील परिस्थिती फारशी माहित नसते. याशिवाय हि झालेली बैठक काँग्रेसला धरून आहे की सोडून आहे हेही माहित नसते. अशा शब्दात पटोले यांना टोले लागवताना राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय नेते बोलतील आपल्यासारख्या स्थानिक नेत्यांनी यावर बोलणे टाळले पाहिजे असा खोचक सल्ला देखील दिला. काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी भाजपला रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया कालच पटोलेंनी दिली आहे.

प्रशासन मॅनेजमेंटपेक्षा महाविकास आघाडी एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त, आठवलेंचा पुन्हा खोचक टोला

मराठी भाषा दिनावरुन विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला, तर राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याची टीका

प्रियांका गांधी दुसरी इंदिराच, लडकी हूँ, लड सकती हूँ नारा देशव्यापी-यशोमती ठाकूर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.