AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान

Raj Thckeray on Maharashtra Reservation : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापुरात आहेत. इथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. तसंच बाहेरून आलेल्या लोकांवर महाराष्ट्राचा पैसा खर्च होतो, असं राज ठाकरे म्हणालेत.

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान
राज ठाकरेImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 05, 2024 | 4:03 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दौरा करत आहेत. मराठवाडा दौरा त्यांचा सुरु आहे. आज सकाळी ते सोलापुरात होते. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आहे. या आरक्षणाच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

परप्रांतियांच्या मुद्द्यावर भाष्य

मुंबई, ठाणे किंवा इतर शहरांमध्ये जसा विकास झालाय. जसे उड्डाणपूल झालेत. या गोष्टी का होतात? मूळच्या लोकांसाठी या गोष्टी होत नाहीत. तर बाहेरून अतिरिक्त येणाऱ्या लोकांसाठी हे केलं जात आहे. आपल्या राज्यातील सर्वाधिक पैसा हा बाहेरून आलेल्या लोकांवर खर्चा होतोय. ठाणे हा देशातील एकमेव असा जिव्हा आहे, जिथे एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका आहेत. जर ठाण्यात इतक्या महापालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा इतका मोठा आहे की त्यांची व्यवस्था करण्यातच सरकारचा पैसा जातो आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पण तरूणांना माहितीच नसतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

‘400 पार’वर काय म्हणाले?

उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी महाराष्ट्रातील नोकरीच्या जाहिरात निघतात. पण आपल्याकडे येत नाहीत. महाराष्ट्रातील पोरांना नोकरीबद्दल कळतच नाही. गेले अनेक वर्ष हे अशाचप्रकारे सरकार सुरु आहे. पाहिल्यादा भाजपाचा अयोध्येचा उमेदवार बोलला, 400 पार झाले की संविधान बदलणार… मग पहिल्यांदा नरेटिव्ह कोणी दिला? लाडका भाऊ, लाडकी बहीण यापेक्षा लाडका मतदार अशी योजना करा. स्पोर्टच्या बजेट मध्ये सर्वाधिक निधी गुजरातला आहे. या देशातील सर्व राज्याला समान निधी दिला पाहिजे. म्हणजे त्यामुळे अडचण येणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.

राज ठाकरे अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात पोहोचले त्यांनी तिथे दर्शशन घेतलं. बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

Follow Us
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता...
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता....
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला...
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.