AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान

Raj Thckeray on Maharashtra Reservation : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापुरात आहेत. इथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. तसंच बाहेरून आलेल्या लोकांवर महाराष्ट्राचा पैसा खर्च होतो, असं राज ठाकरे म्हणालेत.

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान
राज ठाकरेImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 05, 2024 | 4:03 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दौरा करत आहेत. मराठवाडा दौरा त्यांचा सुरु आहे. आज सकाळी ते सोलापुरात होते. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आहे. या आरक्षणाच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

परप्रांतियांच्या मुद्द्यावर भाष्य

मुंबई, ठाणे किंवा इतर शहरांमध्ये जसा विकास झालाय. जसे उड्डाणपूल झालेत. या गोष्टी का होतात? मूळच्या लोकांसाठी या गोष्टी होत नाहीत. तर बाहेरून अतिरिक्त येणाऱ्या लोकांसाठी हे केलं जात आहे. आपल्या राज्यातील सर्वाधिक पैसा हा बाहेरून आलेल्या लोकांवर खर्चा होतोय. ठाणे हा देशातील एकमेव असा जिव्हा आहे, जिथे एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका आहेत. जर ठाण्यात इतक्या महापालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा इतका मोठा आहे की त्यांची व्यवस्था करण्यातच सरकारचा पैसा जातो आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पण तरूणांना माहितीच नसतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

‘400 पार’वर काय म्हणाले?

उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी महाराष्ट्रातील नोकरीच्या जाहिरात निघतात. पण आपल्याकडे येत नाहीत. महाराष्ट्रातील पोरांना नोकरीबद्दल कळतच नाही. गेले अनेक वर्ष हे अशाचप्रकारे सरकार सुरु आहे. पाहिल्यादा भाजपाचा अयोध्येचा उमेदवार बोलला, 400 पार झाले की संविधान बदलणार… मग पहिल्यांदा नरेटिव्ह कोणी दिला? लाडका भाऊ, लाडकी बहीण यापेक्षा लाडका मतदार अशी योजना करा. स्पोर्टच्या बजेट मध्ये सर्वाधिक निधी गुजरातला आहे. या देशातील सर्व राज्याला समान निधी दिला पाहिजे. म्हणजे त्यामुळे अडचण येणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.

राज ठाकरे अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात पोहोचले त्यांनी तिथे दर्शशन घेतलं. बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.