AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राऊतांना नपुंसक म्हणायला नित्या राणे संजय राऊत तुझ्या घरी आले होते का?”; ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणे यांच्यावर खरमरीत टीका

संजय राऊत साहेबांच्या तंगड्या तोडण्याचा विचार तुझ्या मनात आल्यावर शिवसैनिक तुझे दोन्ही तंगड्या तोडतील असा घणाघातही शरद कोळी यांनी त्यांच्यावर केला आहे.

राऊतांना नपुंसक म्हणायला नित्या राणे संजय राऊत तुझ्या घरी आले होते का?; ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणे यांच्यावर खरमरीत टीका
| Edited By: | Updated on: May 14, 2023 | 5:26 PM
Share

सोलापूर : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडी आणि शिवसेना, भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांच्याकडून सातत्याने संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जाते. मात्र त्यावरूनच आता राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यावरून ठाकरे गटाचे नेत्यांनी आता नितेश राणे यांच्यासह राणे कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे सोलापूरातील नेते शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना शरद कोळी यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना जशास तशा भाषेत उत्तर दिले आहे.

नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर नपुसक असल्याची जहरी टीका केली होती, त्यावरूनच शरद कोळी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

यावर बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांना नपुंसक म्हणायला नित्या राणे खासदार राऊत तुझ्या घरी आले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता भविष्यात हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

नितेश राणे यांच्यावर टीका करताना, तुम्ही कोणाला दम देत आहात . संजय राऊतसाहेब हे मर्द आहेत म्हणून ते 100 दिवस जेलमध्ये राहिले होते असा घणाघात त्यांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे.

तर संजय राऊत यांच्याविरुद्ध तुम्ही राणे कंपनी आहात. नित्या तू ईडी आणि भाजपच्या दबावाला घाबरून भाजपत प्रवेश केला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे नितेश राणे तुमच्या भुरट्या दादागिरीला ते घाबरणार नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यांच्या उंचीवरूनही त्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. दीड फुट्या नित्या 3 महिन्यात मविआ सरकार सत्तेत येणार आणि तुला जेलमध्ये टाकणार असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय राऊत साहेबांच्या तंगड्या तोडण्याचा विचार तुझ्या मनात आल्यावर शिवसैनिक तुझे दोन्ही तंगड्या तोडतील असा घणाघातही शरद कोळी यांनी त्यांच्यावर केला आहे.

राणे तुझ्यात दम असेल तर सिक्युरिटी काढून मैदानात ये मग कोणाच्या मनगटात नेट आहे ते बघू अशा शब्दात शरद कोळी यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

त्यामुळे नितेश राणे तुझा हिशोब व्याज, मुद्दलासह घेतल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही अशी टीका करत त्यांनी नितेश राणे यांना मैदानात या मग बघू असा इशारा त्यांनी दिला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.