AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : सोलापूर दगडफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल, वादग्रस्त भाषण करणाऱ्यांवर कारवाई होणार का?

मिळालेल्या माहितीनुसार  मोर्चाच्या पूर्वी भाजप आमदार नितेश राणे, आमदार टी राजा सिंग  या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याबाबात ही नोटीस होती. सभेदरम्यान नितेश राणे आणि टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल

Solapur : सोलापूर दगडफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल, वादग्रस्त भाषण करणाऱ्यांवर कारवाई होणार का?
नितेश राणेImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 07, 2024 | 11:22 AM
Share

सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur Stone Planting)  हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर 15 अज्ञातांविरोधात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल हिंदू जनआक्रोश मोर्चा दरम्यान मधला मारुती चौकात दोन गटात दगडफेक झाली. काल पोलिसांनी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली. वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा आणि लव्ह जिहाद कायदा आमलात आणावा यामागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात  आमदार नितेश राणे आणि आमदार टी. राजा हे देखील सहभागी झाले होते. भाषणामध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती. ही भाषणं तपासून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाबजी यांची कारवाईची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार  मोर्चाच्या पूर्वी भाजप आमदार नितेश राणे, आमदार टी राजा सिंग  या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. धार्मिक तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याबाबात ही नोटीस होती. सभेदरम्यान नितेश राणे आणि टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  या मागणीचे निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाबजी यांनी दिली आहे. याशिवाय काल झालेल्या दगडफेकीनंतर आज दुकानं आणि व्यव्हार सुरळीत सुरू झाले आहेत.

काय म्हणाले होते नितेश राणे ?

वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात हा कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहील असं नितेश राणे म्हणाले.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.