AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही, कारण ते…; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole on Devendra Fadnavis and Lolsabha Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही, कारण ते...; नाना पटोलेंची घणाघाती टीका
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 02, 2024 | 3:58 PM
Share

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत, असं पटोले म्हणालेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले आज सोलापुरात आहेत. तिथे ते बोलत होते. शाप देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे हे आम्ही पोथी पुराणात वाचले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे मटण खाणारे ब्राह्मण आहेत. यांच्या शाप लागत नाही, हे त्यांना देखील माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि आम्हीसोबत मटण खाललं आहे, असं नान पटोले म्हणाले.

भाजपवर निशाणा

पंतप्रधान मोदींनी सोलापूरच्या प्रश्नांना हात घातला नाही. किंबहुना मागील वेळी दिलेल्या आश्वासनाबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही. धर्माच्या आधारावर सुरू असलेली मोदींचे भाषण ऐकायला लोकांना कंटाळले आहेत. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी लोकांना पैसे देऊन आणावे लागतात. तर राहुल गांधींचा सभेला लोक उन्हात उभा राहायला तयार आहे. या निवडणुका देशाच्या आहेत धर्माच्या नाहीत. आता सोलापुरात कोणतेही नेते आले तरी मोदीचे सरकार येणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

गृहखाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यांना महाराष्ट्रातील चित्र कळले आहे. बुथवर जेवढे मतदान झाले त्यावर दोन-तीन टक्के मतदान वाढवत आहेत. निवडणूक आयोगाने 70 C प्रमाणे आकडे असावेत. त्यांनी ती चूक करू नये अशी आमची भूमिका आहे, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना मोदी मौनी बाबा म्हणायचे. इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील. नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. कर्नाटकचा प्रज्वल असो किंवा देशभरातले भ्रष्टाचारी हीच भाजपची ओळख आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........