AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Accident : सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

कल्याणहून सोलापूरकडे घरचे सामान घेऊन आयशर टेम्पो चालला होता. यादरम्यान शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास देवडी गावातील शिवारात श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख आणि रिहान फैजल कयेशअल्ली हे दोघे जागीच ठार झाले.

Solapur Accident : सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
सोलापूरमध्ये मोहोळजवळ टेम्पो व जीपचा अपघातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 11:07 PM
Share

सोलापूर : रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पो (Tempo)ला पाठीमागून पिकप जीप (Jeep)ने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार (Death) तर दोघे जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. देवडी गावच्या शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ शुक्रवारी पहाटे 5 वाजता ही घटना घडली. रिजवान अब्दुल गणी शेख (22) आणि रिहान फैजल कयेशअल्ली (35) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी टेम्पो चालक चेतन बिभीषण खंदारे यांच्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास अपघात पथकाचे ज्योतिबा पवार हे करीत आहेत.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला जीपची धडक

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणहून सोलापूरकडे घरचे सामान घेऊन आयशर टेम्पो चालला होता. यादरम्यान शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास देवडी गावातील शिवारात श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख आणि रिहान फैजल कयेशअल्ली हे दोघे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले दोघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आयशर टेम्पोचा चालक चेतन बिभीषण खंदारे हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीतत लग्नाची खरेदी करून येणाऱ्या भावी नवरदेवावर काळाचा घाला

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मागरुळी पेठ येथील नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. लग्नाची खरेदी करुन परतत असताना दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. सागर गिरी (28) असे मृत्यू झालेल्या भावी नवरदेवाचे नाव आहे. नागपूर येथे मेडीकल कॉलेजमध्ये उपचारा दरम्यान रात्री सागरचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुख:चे सावट पसरले आहे. सागर गिरी याचा विवाह सोहळा नागपूर येथे 18 मे 2022 ला होणार होता. त्यामुळे परिवारासह लग्नाच्या खरेदीसाठी गेले व खरेदी करून गावी परतत असताना दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.