AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळजापुरात कडकडीत बंद! संभाजीराजेंचा अवमान केल्याप्रकरणी गावकरी संतप्त, गाभाऱ्यात जाण्यापासून अडवल्यानं वाद

विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोनही केला होता. तरीदेखील त्यांना गाभाऱ्यात सोडण्यात आलं नव्हतं.

तुळजापुरात कडकडीत बंद! संभाजीराजेंचा अवमान केल्याप्रकरणी गावकरी संतप्त, गाभाऱ्यात जाण्यापासून अडवल्यानं वाद
कडकडीत बंदImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 9:32 AM
Share

उस्मानाबाद : तुळजापूरमध्ये (Tuljapur Temple News) बंदची हाक देण्यात आली होती. छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhaji Raje) यांचा अवमान केल्याप्रकरणी गावकरी संतप्त झाले होते. त्यामुळे तुळजापूरमधील गावकरी आणि व्यापाऱ्यांनी याबाबत निषेध नोंदवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक दिली होती. त्यानुसार तुळजापूरमध्ये कडकडीत बंद (Tuljapur closed) पाहायला मिळालाय. तुळजापूर शहर शंभर टक्के बंद असल्याचं चित्र गुरुवारी सकाळी पाहायलाम मिळालं. तुळजापूर बंदला पुजारी, व्यापारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. जिल्हाधिकारी, मंदीर तहसीलदार व व्यवस्थापक यांच्या कारवाईच्या मागणीसाठी तुळजापूर शहर बंद ठेवण्यात आलंय. छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त झालेत. तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधिकारी यांनी प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवनी मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सोमवारी 9 मे रोजी छत्ररती संभाजीराजे हे तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. खरंतर छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेत असल्याचं याआधीही पाहण्यात आलं होतं.

मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली. त्यानंतर इतर भाविकांप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंनाही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात आला. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोनही केला होता. तरीदेखील त्यांना गाभाऱ्यात सोडण्यात आलं नव्हतं. शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज झाल्याचं सांगितलं जातं होतं.

कडकडीत बंदचा थेट आढावा : पाहा व्हिडीओ

कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकरणानंतर आता तुळजापूरमध्ये बंद पाळत निषेध नोंदवण्यात आला आहे. तसंच तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरी देखील नागरिक जिल्हाधिकरी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. मुजोर प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जाते आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.