AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 पैकी 100 मार्क्स मिळवणारा आर्य किती तास अभ्यास करायचा? आर्यने सांगितला यशाचा सिक्रेट फॉर्मुला

SSC Result : कोल्हापूरच्या आर्य गौतम नाईकने दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत यश संपादन केले. त्याने दररोज किती तास अभ्यास केला आणि त्याच्या यशामागचं सिक्रेट काय आहे हे जाणून घेऊयात.

100 पैकी 100 मार्क्स मिळवणारा आर्य किती तास अभ्यास करायचा? आर्यने सांगितला यशाचा सिक्रेट फॉर्मुला
Aarya NaikImage Credit source: Google
| Updated on: May 08, 2026 | 6:59 PM
Share

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल 92.09 टक्के इतका लागला आहे. तसेच 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 28 हजार 25 विद्यार्थी फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22 हजार 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळवले आहेत. यात कोल्हापूर आणि बीडमधील काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी 100 मार्क्स मिळवण्यासाठी किती तास अभ्यास केला हेही आता समोर आलं आहे.

सिध्दी कर्डीलेला 100 टक्के

बीड जिल्हा हा सातत्याने काही ना काही कारणाने चर्चेत असतो पण आज एक सकारात्मक गोष्ट बीड जिल्ह्यात घडली आहे. आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील डोंगरगण येथील इयत्ता 10 मधील विद्यार्थी सिध्दी संजू कर्डीले हिने 100 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. या यशा बद्दल सिध्दीचे सर्वत्र कौतुक होत असून आई वडिलांनी तिचे औक्षण करून पेढे भरवून कौतुक केले आहे.

आर्यने सांगितले यशाचे सिक्रेट

कोल्हापुरातील आर्य गौतम नाईक यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये 100% मार्क मिळवले आहेत. त्यामुळे आई-बाबांबरोबरच नातेवाईकांकडून आर्यच कौतुक केलं जातं आहे. लहानपणापासूनच आर्यने शाळेमधील पहिला नंबर कधीच सोडला नाही. तो दररोज दोन ते तीन तास अभ्यास करत होता, त्याचबरोबर परीक्षेच्या दरम्यान दररोज सात ते आठ तास अभ्यास करून आर्यने हे यश मिळवले आहे. अभ्यासाबरोबरच क्रिकेट खेळणे, माऊथ ऑर्गन वाजवणे, नाटकांमध्ये काम करणे असे छंद आर्यला आहेत. आर्यला वडिलांप्रमाणे सीए बनण्याची इच्छा आहे.

लातूर विभागातील 104 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

दहावीच्या निकालात लातूर विभागाने लक्ष वेधून घेतले आहे, लातूर विभागातल्या 104 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. त्यामुळे आता या विभागातील विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41 टक्के लागला आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...