AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Exams | मुंबईतल्या बहुतांश शाळा पुन्हा ऑनलाइन, काय आहे नेमकं कारण?

येत्या 15 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी अनेक शाळांनी 04 एप्रिलपर्यंत इतर वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील, असे सांगितले आहे.

SSC Exams | मुंबईतल्या बहुतांश शाळा पुन्हा ऑनलाइन, काय आहे नेमकं कारण?
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Mar 12, 2022 | 11:27 AM
Share

मुंबईः पुढील काही दिवस मुंबईतल्या बहुतांश शाळा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने (Offline Schools) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार नाही, असा निर्णय अनेक स्टेट बोर्डाच्या शाळांनी घेतला आहे. कारण येत्या मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. बहुतांश शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, याकरिता इतर इयत्तांच्या वर्गांची शिकवणी ऑनलाइन पद्धतीने (Online Schools) घेतली जाणार आहे. 15 मार्च ते 04 एप्रिल या कालावधीत दहावीच्या परीक्षांचे (SSC Board Exams) नियोजन आहे. त्यामुळे या काळात इतर वर्ग ऑनलाइन भरवण्यात येतील आणि दहावीची परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येईल, असा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे.

मार्च महिन्यात काय स्थिती?

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. मार्च महिन्यात मुंबईतील शाळा 100 टक्के ऑफलाइन पद्धतीने सुरु होत्या. यावेळी विद्यार्थ्यांची 80 ते 90 टक्के उपस्थिती दिसून आली. अनेक शाळांमधील या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम संपला असून विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी सुरु आहे.

या वर्षी ऑनलाइन, ऑफलाइन दोन्हीही!

दरम्यान, येत्या 15 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी अनेक शाळांनी 04 एप्रिलपर्यंत इतर वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील, असे सांगितले आहे. तसेच शहरात मार्च महिन्यात ऑफलाइन शाळा असली तरीही अनेक शाळांनी व्हर्चुअल शिकवणी सुरुच ठेवली होती. या शैक्षणिक वर्षात तरी अशा प्रकारची हायब्रिड शिक्षण पद्धती सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भायखळा येथील शाळेच्या प्राचार्यांनी सांगितलं. दहावीच्या परीक्षेची वेळ 10.30 ते 2.00 अशी आहे. तसेच ज्या दिवशी दहावीचे पेपर नसतील, त्या दिवशी शाळा सुरु ठेवण्याचा निर्णयही अनेक शाळांनी घेतला आहे.

इतर बातम्या-

पुण्यात रविवारी उद्घाटनांचा धडाका; एकट्या अजित दादांच्या हस्ते 29 ठिकाणी नारळ फुटणार

अंबरनाथमध्ये दुकानदाराला सात लाखांचं वीजबिल! विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप

Untimely Rain : अवकाळीची अवकृपा सुरुच, शेतीमाल बाजारपेठत तरीही नुकसान अटळच

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.