AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘येत्या 36 तासांमध्ये पाकिस्तानसोबत युद्धाला सुरुवात’, भगरे गुरुजींचं भारताबाबत मोठं भाकीत, कुंडलीतील योगही सांगितला

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मोठं भाकीत केलं आहे, येत्या 36 तासांमध्ये युद्धाला सुरुवात होईल असा दावा त्यांनी केला आहे.

'येत्या 36 तासांमध्ये पाकिस्तानसोबत युद्धाला सुरुवात', भगरे गुरुजींचं भारताबाबत मोठं भाकीत, कुंडलीतील योगही सांगितला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2025 | 9:24 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानसोबतचा व्यापर देखील बंद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावर आहे. भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये औषधांचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे.

भारत -पाकिस्तान युद्धाबाबत आता प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या 36 तासांमध्ये भारत -पाकिस्तान युद्धाला सुरुवात होईल असा दावा त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  भारताला शनी तिसरा आहे. भारताची रास मकर आहे. भारताची साडेसाती 29 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे भारताचे ग्रह अनकुल असल्याचंही भगरे यांनी म्हटलं आहे.

युध्द झाले तर त्यामध्ये भारताची बाजू वरचढ आहे. मे महिन्यात तीन ग्रह बदलणार आहेत त्यामुळे दोन देशामध्ये मोठा उत्पाद घडण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे नुकसान पाकिस्तानचे होणार आहे. पाकिस्तानचा काही भूभाग आपल्याकडे येण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे येत्या 36 तासांमध्ये सीमेवर भारत पाकिस्तानमध्ये युध्दाला‌ सुरुवात होण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकले तर ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणता येईल,  अशी भविष्यवाणी ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी वतर्वली आहे. एवढंच नाही तर त्यांनी सध्या झालेल्या ग्रहस्थितीबाबत देखील माहिती दिली आहे. भगरे गुरुजी यांनी मोठा दावा केला आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.