AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘येत्या 36 तासांमध्ये पाकिस्तानसोबत युद्धाला सुरुवात’, भगरे गुरुजींचं भारताबाबत मोठं भाकीत, कुंडलीतील योगही सांगितला

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मोठं भाकीत केलं आहे, येत्या 36 तासांमध्ये युद्धाला सुरुवात होईल असा दावा त्यांनी केला आहे.

'येत्या 36 तासांमध्ये पाकिस्तानसोबत युद्धाला सुरुवात', भगरे गुरुजींचं भारताबाबत मोठं भाकीत, कुंडलीतील योगही सांगितला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2025 | 9:24 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानसोबतचा व्यापर देखील बंद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावर आहे. भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये औषधांचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे.

भारत -पाकिस्तान युद्धाबाबत आता प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या 36 तासांमध्ये भारत -पाकिस्तान युद्धाला सुरुवात होईल असा दावा त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  भारताला शनी तिसरा आहे. भारताची रास मकर आहे. भारताची साडेसाती 29 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे भारताचे ग्रह अनकुल असल्याचंही भगरे यांनी म्हटलं आहे.

युध्द झाले तर त्यामध्ये भारताची बाजू वरचढ आहे. मे महिन्यात तीन ग्रह बदलणार आहेत त्यामुळे दोन देशामध्ये मोठा उत्पाद घडण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे नुकसान पाकिस्तानचे होणार आहे. पाकिस्तानचा काही भूभाग आपल्याकडे येण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे येत्या 36 तासांमध्ये सीमेवर भारत पाकिस्तानमध्ये युध्दाला‌ सुरुवात होण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकले तर ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी म्हणता येईल,  अशी भविष्यवाणी ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी वतर्वली आहे. एवढंच नाही तर त्यांनी सध्या झालेल्या ग्रहस्थितीबाबत देखील माहिती दिली आहे. भगरे गुरुजी यांनी मोठा दावा केला आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...