AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ; उत्तर भारतीय घुसला अन्…नेमकं काय घडलं?

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली. याच पत्रकार परिषदेत अचानक गोंधळ उडाल्याची घटना घडली.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ; उत्तर भारतीय घुसला अन्...नेमकं काय घडलं?
election commission
| Updated on: Nov 04, 2025 | 6:44 PM
Share

Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम सविस्तरपणे सांगितला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्य राज्य निवडणूक आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. याच दरम्यान, पत्रकार परिषद चालू असतानाच मोठा गोंधळ उडाला. एका व्यक्तीला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नेमकं काय घडलं?

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद चालू होती. यावेळी उपस्थित असलेले पत्रकार निवडणूक आयोगाला एक-एक प्रश्न विचारत होते. तर निवडणूक आयोगदेखील विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देत होता. मात्र याच वेळी एक व्यक्ती आली आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारायला लागली. विशेष म्हणजे ही व्यक्ती पत्रकार नव्हती. तरीदेखील त्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत पत्रकार म्हणून स्थान देण्यात आलं. ही व्यक्ती पत्रकार नसल्याचे समजताच अन्य पत्रकारांनी त्यांना थांबवलं. पत्रकार नसताना तुम्ही प्रश्न का विचारत आहात? असा सवाल करत या व्यक्तीला थांबवण्यात आलं. नंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. सध्या या व्यक्तीची चौकशी चालू आहे.

राजेश त्रिपाठी नावाच्या व्यक्तीने घातला गोंधळ

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजेश त्रिपाठी असे गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या वतीने या व्यक्तीने प्रश्न विचारला होता. मात्र त्याला पत्रकारांनी त्याला मध्येच रोखले आणि नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पक्षांतर आणि राजीनाम्यांची नवी लाट येण्याची शक्यता

दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचाराची रणधूमाळी पाहायला मिळणार आहे. सोबतच या काळात पक्षांतर आणि राजीनाम्यांची नवी लाट येऊ शकते. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत