AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदापासून का डावललं जातं?’; सुषमा अंधारे यांचा तिखट सवाल 

सुषमा अंधारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी बावनकुळे यांच्या ओबीसी प्रतिनिधित्वाबाबत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम मशीनच्या चुकीच्या वापराच्या आरोपाबरोबरच महायुतीच्या विजयाचा जल्लोष नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रिकाउंटिंग मागणीच्या बाबतीत पक्षपातीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

'चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदापासून का डावललं जातं?'; सुषमा अंधारे यांचा तिखट सवाल 
सुषमा अंधारे
| Updated on: Nov 26, 2024 | 9:59 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत खोचक प्रश्न विचारत भाजपवर निशाणा साधला आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांची साउथच्या ब्रह्मासारखी अवस्था होती की काय ते बघा? जेव्हा जेव्हा भाजपच्या अंगावर येतं तेव्हा वारं झेलायला बावनकुळे आहेत की काय? मेवा खायच्या वेळेस मात्र तेच तेच चेहरे पुढे येतात. भाजपमध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत का पोहोचू शकत नाही? बावनकुळे साहेबांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी त्यांना का डावलले जात आहे याचा त्यांनी विचार करावा”, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

“ईव्हीएमबद्दलचा उद्रेक याच्याआधी कधीच झाला नव्हता, जो आता महाराष्ट्रात दिसून येत आहे. महायुतीने एवढा मोठा विजय मिळवला आहे. मात्र त्याचा विजयाचा जल्लोष कुठे दिसत नाही. अनेक ठिकाणी मतदानाची आकडेवारी मिस मॅच आहे. जिथे जिथे महायुतीच्या उमेदवारांनी रिकाउंटिंगची मागणी केली ती स्वीकारली गेली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराची रिकाउंटिंग मागणी स्वीकारली नाही. हा पक्षपातीपणा आहे. ईव्हीएम मशीनची याचिका जर कोर्टाने फेटाळून लावली तर शेवटचं आशा स्थान म्हणून आम्ही कोणाकडे पाहायचं?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

‘बावनकुळे यांना मुख्यमंत्री पदासाठी का डावलले जात आहे?’

“हा सर्व खेळच खुर्चीचा आहे. पक्षपातीपणा केला जात आहे. यावेळेस मुख्यमंत्री पदाचे खरे हकदार देवेंद्र फडवणीस आहेत. भाजपमध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत का पोहोचू शकत नाही? चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी त्यांना का डावलले जात आहे? याचा त्यांनी विचार करावा”, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.