Tauktae Cyclone : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील 64, तर खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात उद्या सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Tauktae Cyclone : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील 64, तर खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा
तौत्के चक्रीवादळ
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 5:19 PM

रायगड : ‘तौक्ते चक्रीवादळा’चा फटका कोकणातील समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांना बसण्यास आता सुरुवात झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगडमध्ये समुद्र खवळल्याचं पाहायला मिळतयं. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरील 62, तसंच खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात उद्या सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलीय. (Alert to coastal villages in Raigad district on the backdrop of cyclone Tauktae)

ज्याचं घर कच्चं, खराब स्लॅब आणि भिंती आहेत, अशांनी घरात न राहता तत्काळ सुरक्षितस्थळी जावं, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. आदिवासी भागात किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करत जवळच्या शाळा किंवा शेल्टर होममध्ये राहावं, अशी सूचना मिळाल्यास तत्काळ घर सोडवं अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांनी केलीय. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर PWD, NHAL, MSEDCL, MSRDC यांच्या यंत्रणाना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लसीकरण बंद, रुग्णांसाठी उपाययोजना सुरु

कोरोना संकटाच्या काळात ताऊक्ते चक्रीवादळामुळे चिंता अधिक वाढलीय. जिल्हात 59 खासगी आणि सरकारी रुग्णालयात कोविड रुग्ण ऑक्सिजन आणि ICU मध्ये आहेत. तर जिल्ह्यात 10 हजारापेक्षा अधिक कोरोना असल्यानं प्रशासनानं त्याबाबत तयारी सुरु केलीय. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील लसीकरण बंद राहणार आहे. तसंच हे दोन दिवस फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा सुरु राहणार आहेत.

हवामान विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन

हवामान विभागाचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. सिंधुर्गात आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात काही झाडे, विजेचे पोल उन्मळून पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर होसाळीकर यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

किनारपट्टीवरील 68 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

तौक्ते चक्रीवादळ सध्या सिंधुदुर्गाच्या मालवण किनारपट्टीजवळ आहे. मालवणचा समुद्र सकाळपासून खवळलेला आहे. मालवणच्या किनारपट्टीवर सकाळी अकरा वाजेपासून दोन ते तीन मीटरच्या उंचीपर्यंत लाटा उसळत होत्या. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालं आहे. जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीरील 68 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

संबंधित बातम्या : 

Tauktae Cyclone | जम्बो कोव्हिड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर ते रुग्णालयात बॅकअप यंत्रणा, राज्य शासनाची नेमकी तयारी काय?

Tauktae Cyclone: रत्नागिरीच्या देवरुखमध्ये भलमोठं झाडं कोसळलं, तोक्ते चक्रीवादळामुळं वाऱ्यांचा वेग 40 किमी

Alert to coastal villages in Raigad district on the backdrop of cyclone Tauktae

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.