AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्या दौरा मुख्यमंत्र्यांचा, अन् फायदा उद्धव ठाकरे यांना…; ‘या’ आमदाराने सांगितले दौऱ्यातील फायद्यातोट्याचं गणित

ज्या आमदारांना घेऊन अयोध्या दौरा केला आहे ते एकत्र राहिले पाहिजेत म्हणून हा अयोध्या दौरा आयोजित केला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

अयोध्या दौरा मुख्यमंत्र्यांचा, अन् फायदा उद्धव ठाकरे यांना...; 'या' आमदाराने सांगितले दौऱ्यातील फायद्यातोट्याचं गणित
| Edited By: | Updated on: Apr 08, 2023 | 6:50 PM
Share

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. एकीकडे विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र अयोध्या दौरा हा बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अयोध्या दौऱ्यावर जात असल्याचे मत शिंदे गटाकडून दिले जात आहे. त्यामुळे आता अयोध्या दौऱ्यावरून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौरा काढला असला तरी गेल्या काही दिवसांपासून या दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभा राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका झाल्यानंतर मत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

ज्यांनी कधीही अयोध्या दौरा केला नाही. त्यांना या दौऱ्याचे महत्व काय वाटणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, रावण राज्य चालवून हे अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने म्हटले आहे की, शिवसेनेचे धनुष्य चोरून आणि केलेले पाप धुण्यासाठी म्हणून शिंदे गट अयोध्येला निघाला असल्याचे म्हटले आहे.

तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका करताना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि चाळीस आमदार अयोध्येला गेले तरी त्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास गमावला असल्याची टीका केली आहे.

तर आमदारांना दिलेली मंत्रिपदाची आश्वासने पूर्ण झाली नाहीत त्यामुळे आज 40 पैकी अनेक आमदार चलबिचल झाले आहेत, त्यांना नैराश्य आले आहे.त्यांची मनधरणी करण्यासाठी अयोध्या दौरा काढला आहे. मात्र त्यातील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

ज्या आमदारांना घेऊन अयोध्या दौरा केला आहे ते एकत्र राहिले पाहिजेत म्हणून हा अयोध्या दौरा आयोजित केला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौरा केला असला तरी येणाऱ्या काळात उध्दव ठाकरे यांच्यावरच श्रीराम प्रसन्न होतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवले आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.