AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजप आणि शिवसेनेतील घमासान पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही 2023मध्ये सत्तेत येऊ असं विधान केलं.

आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 6:21 PM
Share

संदेश शिर्के, कल्याण: महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजप (bjp) आणि शिवसेनेतील (shivsena) घमासान पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही 2023मध्ये सत्तेत येऊ असं विधान केलं. ठाकरे यांच्या या विधानाचा भाजप नेते, आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी समाचार घेतला आहे. 2024ला सत्तेत येऊ असं आदित्य ठाकरे यांनी झोपेतून उठल्यासारखं विधान केलं आहे. मला वाटतं आदित्य यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या स्मार्ट सिटीच्या कामाचे आदित्य यांनी उद्घाटन केलं, त्याच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला त्यांचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मंत्र्याने विरोध केला होता, अशी टीका रवींद चव्हाण यांनी केली आहे. स्मार्ट सिटी ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आदित्य यांनी किमान मोदींचा उल्लेख करायला हवा होता, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल कल्याण-डोंबिवलीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले. डोंबिवलीत काँक्रिट रस्त्याच्या कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे यांनी 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असं सांगत शिवसेनेचे 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचे सूचक विधान केलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी टीका केली. आदित्य यांना 2024मध्ये सत्तेत येण्याची स्वप्न पडायला लागली आहेत. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे किंवा त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली होती.

त्यांचंच मानसिक संतुलन बिघडलंय

चव्हाण यांच्या या विधानामुळे चांगलंच वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून आमदार चव्हाण यांना प्रत्युत्तर देण्यात आला आहे. शिवसेनेकडून कल्याण-डोंबिवलीत होत असलेली विकासकामे पाहून भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे बघून काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडल्याने अशी वक्तव्य करत आहेत. चव्हाण यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांनी जर विकासकामे केली असती तर त्यांना हे दिवस बघावे लागले नसते, असा टोला युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या:

केडीएमसीच्या प्रभाग रचनेचा वाद पेटला, भाजपचा कोर्टात जाण्याचा इशारा तर गाव समितीचा बहिष्काराचा इशारा

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

Dombivli Murder | सोफासेटमधील मृतदेहाचे गूढ उकलण्याच्या मार्गावर, संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.