AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजप आणि शिवसेनेतील घमासान पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही 2023मध्ये सत्तेत येऊ असं विधान केलं.

आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 6:21 PM
Share

संदेश शिर्के, कल्याण: महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजप (bjp) आणि शिवसेनेतील (shivsena) घमासान पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही 2023मध्ये सत्तेत येऊ असं विधान केलं. ठाकरे यांच्या या विधानाचा भाजप नेते, आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी समाचार घेतला आहे. 2024ला सत्तेत येऊ असं आदित्य ठाकरे यांनी झोपेतून उठल्यासारखं विधान केलं आहे. मला वाटतं आदित्य यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या स्मार्ट सिटीच्या कामाचे आदित्य यांनी उद्घाटन केलं, त्याच स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला त्यांचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मंत्र्याने विरोध केला होता, अशी टीका रवींद चव्हाण यांनी केली आहे. स्मार्ट सिटी ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आदित्य यांनी किमान मोदींचा उल्लेख करायला हवा होता, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल कल्याण-डोंबिवलीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले. डोंबिवलीत काँक्रिट रस्त्याच्या कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे यांनी 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असं सांगत शिवसेनेचे 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचे सूचक विधान केलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी टीका केली. आदित्य यांना 2024मध्ये सत्तेत येण्याची स्वप्न पडायला लागली आहेत. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे किंवा त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झालेला आहे, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली होती.

त्यांचंच मानसिक संतुलन बिघडलंय

चव्हाण यांच्या या विधानामुळे चांगलंच वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून आमदार चव्हाण यांना प्रत्युत्तर देण्यात आला आहे. शिवसेनेकडून कल्याण-डोंबिवलीत होत असलेली विकासकामे पाहून भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे बघून काही लोकांचं मानसिक संतुलन बिघडल्याने अशी वक्तव्य करत आहेत. चव्हाण यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांनी जर विकासकामे केली असती तर त्यांना हे दिवस बघावे लागले नसते, असा टोला युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या:

केडीएमसीच्या प्रभाग रचनेचा वाद पेटला, भाजपचा कोर्टात जाण्याचा इशारा तर गाव समितीचा बहिष्काराचा इशारा

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

Dombivli Murder | सोफासेटमधील मृतदेहाचे गूढ उकलण्याच्या मार्गावर, संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.