AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीकरण केंद्रांवर शेकडोंची गर्दी, शहराची लोकसंख्या 20 लाख, दिवसाला फक्त 1200 डोस, भाजपचे रविंद्र चव्हाण आक्रमक

कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते (Ravindra Chavan slams Maharashtra government over Vaccination).

लसीकरण केंद्रांवर शेकडोंची गर्दी, शहराची लोकसंख्या 20 लाख, दिवसाला फक्त 1200 डोस, भाजपचे रविंद्र चव्हाण आक्रमक
भाजप आमदार रविंद्र चव्हाण
| Updated on: May 10, 2021 | 3:35 PM
Share

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते. मात्र लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळाचे वातावरण आहे. यावरुन भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारसह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकीकडे राज्य लसीकरणात एक नंबर असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून पुरवठा केला जात नाही, असं सांगितलं जातंय. एमएमआर रिजनमध्ये लस उपलब्ध करुन दिली जात नाही. राज्य सरकारचं लसीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे”, असा आरोप रविंद्र चव्हाण यांनी केला (Ravindra Chavan slams Maharashtra government over Vaccination).

‘लसीसाठी नागरिकांची वणवण’

“राज्यात लसीकरणसंदर्भात सर्वच ठिकाणी बोंब आहे. सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. मात्र लसींचा साठा पुरेसा उपलब्ध होत नाही. नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरीकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे. तरी त्यांना दुसरा डोस मिळत नाही”, असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

रविंद्र चव्हाण यांचा हल्लाबोल

18 ते 44 वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणासाठी केवळ कल्याण येथे आर्ट गॅललीत एकच केंद्र आहे. त्याठिकाणी मोठी गर्दी उसळते. इतकेच नाही. कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे या शाळेत सुद्धा लसीकरणासाठी एकच गर्दी होते. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे (Ravindra Chavan slams Maharashtra government over Vaccination).

‘प्रशासनावर कुणाचाही वचक नाही’

कालच्या तारखेत केवळ 1 हजार 200 लसींचा डोस उपलब्ध झाला होता. महापालिकेची लोकसंख्या 20 लाखांची असताना इतके कमी डोस का उपलब्ध करुन दिले जात आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “याठिकाणी सदस्य मंडळ नसल्याने महापालिकेत प्रशासकाच्या हाती कारभार आहे. त्यावर कोणाचाही वचक नाही. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. लसीकरणाचे नियोजन केले गेले पाहिजे. 18 ते 44 वयोगटासाठी अन्य ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली पाहिजे. तसेच दुसरा डोस घेण्याची वेळ झाली आहे. त्यांच्याकरीता पुरेसे डोस उपलब्ध करुन दिले गेले पाहिजेत”, असं चव्हाण म्हणाले.

हेही वाचा : VIDEO : टोकण घेऊन सहा तास रांगेत, लसीसाठी नंबर आलाच नाही, कल्याणच्या लसीकरण केंद्रावर संतप्त नागरिकांचा राडा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.