AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhiwandi Crime : 45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांना अटक

औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे 8 मार्च रोजी आपल्या ब्रिझा कारमधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील 5 कोटी रुपयांची रोकड विविध बॅगमध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले होते. यावेळी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन इसमांनी कार थांबवून कारमधील 45 लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला.

Bhiwandi Crime : 45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांना अटक
45 लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांसह चौघांवर गुन्हा दाखल करत अटक
| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 10:45 PM
Share

भिवंडी : नाशिक मार्गे मुंबई येथे हवाला मार्गे रोख 45 लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या कार चालकास सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावर एका आकोरीसह तीन पोलिसां (Three Police)नी लुटल्याची घटना घडली आहे. हायवेदिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर तिघा अज्ञात इसमांनी कार अडवून पोलीस असल्याचे सांगत चालकाच्या ताब्यातील 45 लाख रुपयांची रोकड (Cash) घेऊन पोबारा केला. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी चारही आरोपींना अटक (Arrest) केली आहे. गुन्ह्यात समावेश असलेले तिघे पोलिस पुणे दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांना नारपोली पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी पोलिसांविरोधात लुटमारी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे. (Four persons, including three policemen from Pune, were arrested in a case of robbery of Rs 45 lakh)

नाशिकमधून मुंबईकडे रक्कम नेण्यात येत होती

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे 8 मार्च रोजी आपल्या ब्रिझा कारमधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील 5 कोटी रुपयांची रोकड विविध बॅगमध्ये घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले होते. यावेळी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन इसमांनी कार थांबवून कारमधील 45 लाख रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला. या प्रकरणी 10 मार्च रोजी रात्री उशिरा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यात समावेश

पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे येथून बाबूभाई राजाराम सोळंकी यास ताब्यात घेतले असता या गुन्ह्याची उकल झाली. त्याची कसून चौकशी केली असता पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने यांचा गुन्ह्यात सहभाग निश्चित झाला. या तिघा जणांनी कार चालकास थांबवून त्याकडील रक्कम लुबाडली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस पथकाने शिताफीने या तिन्ही फरार असलेल्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या सर्व चारही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (Four persons, including three policemen from Pune, were arrested in a case of robbery of Rs 45 lakh)

इतर बातम्या

Parbhani Accident : परभणीत बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.