AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन महाराष्ट्राला वेठीस धरलं, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाना

काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन महाराष्ट्राला वेठीस धरलं, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाना
जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 7:31 AM
Share

ठाणे(भिवंडी) : राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसटी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले.भाजपाच्या नेत्याने शरद पवार का मध्ये पडतात त्यांच्या घरी का बैठका होतात, असा सवाल केला होता? यास आपण त्या ट्विट च्या माध्यमातून उत्तर दिल्याचे आव्हाड यांनी सांगितले. काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

शरद पवार 40 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवतात

गेल्या 40 वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले. ऊसतोड कामगारांचा संप झाला त्यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांच्या मागण्या घेऊन पवार साहेबांकडे यायचे. पवारसाहेब त्यांचे प्रश्नदेखील मिटवायचे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

विडी कामगारांचा संप झाला त्यावेळी देखील नरसय्या आडम व शरद पवार बसून प्रश्न सोडयचे. परंतु, यावेळी उगाचच काही नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतला आणि त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोललो. काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केलं. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या असून फक्त विलीनीकरणाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. मात्र, काही राजकीय नेते एसटी कर्मचाऱ्यांचे फसवणूक करतात, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट

भिवंडीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षपदी शोएब खान गुड्डू यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयाची उभारणी केली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे भिवंडी शहरात आले होते. यावेळी भिवंडीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रांजनोली नाका ते कार्यालय येथपर्यंत मोठी बाईक रॅली काढून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली, या रॅलीमध्ये शेकडो बाईक सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम स्थळ कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. कोरोना नियंत्रणात आला असला तरीही शासनानं जे नियम कोरोना संसर्गाबाबत घालून दिले आहेत त्या नियमांची पायमल्ली कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात आली..

इतर बातम्या:

दक्षिण भारतात Red Alert, सलग 26 दिवस पावसाचा कहर, नोव्हेंबरमध्ये भारतात 143% जास्त पाऊस

Arjun Khotkar | शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात, अर्जुन खोतकरांची तब्बल 18 तास चौकशी

Jitendra Awhad slam BJP leaders over ST Workers Strike

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.