AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध
केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 03, 2021 | 12:19 AM
Share

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याण मलंगगड रोडवरील नांदिवली परिसरात कचऱ्यामुळे हैराण नागरिकांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह कचऱ्याला आग लावून कचरा पेटवून देत निषेध नोंदविला आहे. तसेच केडीएमसीने लवकरात लवकर कचरा उचलला नाही तर उग्र आंदोलन करु, असा इशारा माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेने मे 2020 पासून शून्य कचरा मोहिम सुरु केली आहे. महापालिका हद्दीत कोरोना काळ सुरु असताना शून्य कचरा मोहिम राबविण्यास काही नगरसेवकांचा विरोध होता. तर काही नगरसेवकांनी त्याचे समर्थन केले होते. महापालिकेने शून्य कचरा मोहिम राबवित असताना कचरा कुंड्या काढून टाकल्या होत्या. महापालिकेने नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे आवाहन केले होते. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करुन द्यावा, अशी सक्ती महापालिकेने केली आहे.

महापालिकेची शून्य कचरा मोहिम

मात्र जे नागरीक ओला-सुका कचरा वर्गीकरण करुन देत नाही त्यांचा कचरा महापालिका स्विकारत नाही. त्यामुळे त्यांचा कचरा रस्त्यावर टाकला जातो. टाकण्यात आलेला कचरा महापालिकेचे सफाई कर्मचारी उचलून कचरा गाडीत टाकत नाही. महापालिकेच्या शहरी भागात शून्य कचरा मोहिम चांगल्याप्रकारे राबविली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

27 गावांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य

केडीएमसीत आधी 27 गावे होती. त्यापैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 9 गावे महापालिकेत आहेत. गावे वगळण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. 27 गावातील कचरा योग्यप्रकारे आणि नियमीत उचलला जात नाही. 27 गावात प्रत्येक ठिकाणी कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अखेर माजी नगरसेवकाने कचरा पेटवून दिला

याबाबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीदेखील प्रशासनाला काही एक फरक पडताना दिसत नाही. महापालिकेच्या कार्यप्रणालीला कंटाळून संतप्त नागरीकांच्या उपस्थित माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आज दुपारी नांदिवली येथील रस्त्यावर न उचललेल्या कचऱ्याला आग लावून पेटून दिलं. त्यांनी कचरा पेटवून महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. प्रशासनाने या निषेधाची दखल न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांच्यासह संतप्त नागरीकांनी दिला आहे.

हेही वाचा : Maharashtra HSC Result 2021 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!