AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता, ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला; कपिल पाटील म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

भाजप नेते आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज ठाण्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. (kapil patil's Jan Ashirwad Yatra' start from thane)

रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता, ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला; कपिल पाटील म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!
kapil patil
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 2:00 PM
Share

ठाणे: भाजप नेते आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज ठाण्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली. यावेळी कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. प्रभू रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता. ठाण्याचा वनवास 74 वर्षांनी संपला. मोदींनी मला मंत्रिपद दिलं. मोदी है तो मुमकीन है, असं कपिल पाटील म्हणाले. (kapil patil’s Jan Ashirwad Yatra’ start from thane)

भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. आज ठाण्यातून कपिल पाटील यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली. ही जन यात्रा ठाणे आणि रायगड या भागात जाणार आहे. ज्यांच्यामुळे तुम्ही मंत्री म्हणून पोहचलात त्यांचे पाहिले आशीर्वाद घ्या, असं मोदींनी सांगितलं. म्हणूनच जनतेचा आशीर्वाद घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही काम करत आहोत. त्यासाठी उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण देशासाठी काम करायचंय

मोदींमुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. रामाचा वनवास हा 14 वर्षाने संपला होता. मात्र ठाण्याचा वनवास 74 वर्षाने संपला आहे. खऱ्या अर्थाने हे मंत्री पद ठाण्याला मिळाले. त्यामुळे मोदी हे तो मुमकींन है… मला दिलेली जबाबदारी ही ठाण्यापुरती नाही संपूर्ण देशात काम करायचे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2014 पर्यंत मी भरकटलेलो होतो, आता नेमकी दिशा सापडली आहे, असंही ते म्हणाले.

सरकारने विचार करावा

यावेळी त्यांनी दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याच्या मागणीचं समर्थन केलं. दि. बा. पाटील हे नाव देण्याची मागणी ही माझी नाही. ही मागणी भूमिपुत्रांची आहे. त्याबाबत राज्य सरकारने विचार करावा आणि ते निश्चित विचार करतील असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

कपिल पाटलांचा झंझावात

ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदी आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागली आहे. तसेच केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला 27 मंत्रीपदे मिळाली आहेत. सर्व समाजाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. प्रथम केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेस ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून 16 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. येत्या 20 ऑगस्टला भिवंडी तालुक्यात त्यांच्या यात्रेची सांगता होईल. या दरम्यान कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, अलिबाग, रेवदंडा, पेन, पनवेल, उरण, नवी मुंबई, कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, किनवली, शहापूर आदी विविध भागातून यात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. (kapil patil’s Jan Ashirwad Yatra’ start from thane)

संबंधित बातम्या:

राणेंवर ‘मिशन 114’ची जबाबदारी, महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही; विनायक राऊतांचा राणेंवर जोरदार हल्ला

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवारपासून सुरुवात; ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथून शुभारंभ!

(kapil patil’s Jan Ashirwad Yatra’ start from thane)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?