AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर वीज पुरवठा खंडीत करु, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर वेळप्रसंगी आम्ही वीज पुरवठा खंडीत करु, असा इशारा महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिला आहे (Maharashtra power firm employees demand status of frontline workers).

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर वीज पुरवठा खंडीत करु, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
एसईए संघटनेचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडे
| Updated on: May 26, 2021 | 11:26 PM
Share

कल्याण (ठाणे) : राज्यभरात महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या, लसीकरण, कोविड मृत्यूमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांस 50 लाखाचा विमा आणि आरोग्यात विमात केलेले बदल पुन्हा पूर्वरत करण्यात यावे, अशी मागणी वीज कर्मचारी वर्गाने केली आहे. या मागणीसाठी कल्याणमध्ये वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागण्या पूर्व न झाल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे (Maharashtra power firm employees demand status of frontline workers).

वीज कर्मचाऱ्यांची नेमकी भूमिका काय?

वीज कर्मचाऱ्यांची एसईए संघटनेचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडे यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. “MSCB चे जे 86 हजार कर्मचारी आणि अभियंते आहेत त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात यावी, या मागणासाठी आम्ही राज्यभरातील सर्व आमदारांना भेटून निवेदन देत आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली Maharashtra power firm employees demand status of frontline workers).

“आमची सहा संघटनांची एक कृती समिती आहे. या कृती समितीने 24 मे पासून कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर वीज पुरवठाही खंडीत होऊ शकतो. त्यामुळे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा, अशी आमची सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे. कर्मचारी आणि कुटुंब यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आम्ही मागणी करतो आहोत”, अशी भूमिका श्रीनिवास बोबडे यांनी मांडली.

प्रमुख चार मागण्या कोणत्या?

1) आम्हाला फ्रंटलाईन वर्कस म्हणून दर्जा द्या

2) ज्या कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन झालंय त्यांना 50 लाखांचं विमा कवच देणे

3) लसीकरणासाठी सरकार आणि प्रशासनाने जबाबदारी घ्यावी.

4) विमा पॉलिसीचा टीपीए न विचारता बदलला. तो आम्हाला पूर्ववत करावा.

हेही वाचा : सरकारने 1 जूनपासून व्यापाऱ्यांची दुकानं अन् बाजारपेठा उघडावीत, CAIT ची मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.