AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidoe: मोदी भाषणात चांगलं बोलतात, पण त्यावर कृती होत नाही! सुप्रिया सुळे यांची शेतकरी आंदोलनावरून टीका

मोदीजी भाषणात आणि मन की बात मध्ये खूप चांगलं आणि पटेल असं बोलतात, पण त्याची कृती होत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule Narendra Modi)

Vidoe: मोदी भाषणात चांगलं बोलतात, पण त्यावर कृती होत नाही! सुप्रिया सुळे यांची शेतकरी आंदोलनावरून टीका
सुप्रिया सुळे,खासदार
| Updated on: Feb 21, 2021 | 6:43 PM
Share

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narnedra Modi) हे मन की बात आणि त्यांच्या भाषणात जे काही बोलतात, ते त्यांच्या कृतीतून उतरत नसल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. अंबरनाथमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. मोदी संसदेत बोलताना फोन करा, म्हणाले. मात्र, आम्ही फोन लावून थकलो. पीएमओमध्ये आमचा फोन कोणीही उचलत नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी मोदींना लगावला. (NCP MP Supriya Sule slams PM Narendra Modi over Farmer Protest)

मोदी कुटुंब प्रमुख समजूत काढण्याची जबाबदारी त्यांची

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून एक कुटुंबप्रमुख आहेत. आपल्या घरातलं एखादं मूल जर नाराज असेल, तर त्याची समजूत काढण्याची जबाबदारी ही कुटुंबप्रमुखाची असते. मोदी संसदेत म्हणाले की मला एक फोन करा, मी शेतकऱ्यांशी बोलायला तयार आहे. पण, आम्ही फोन लावून लावून थकलो, तरी आमचा फोन पंतप्रधान कार्यालयात कुणी घेत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना फोन केला तर काय होईल?

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या फोनची वाट पाहण्यापेक्षा एक फोन शेतकरी नेत्यांना केलात, तर ते तुमच्याशी बोलायला येणार नाहीत का? असा सवालही त्यांनी विचारला. मोदीजी भाषणात आणि मन की बात मध्ये खूप चांगलं आणि पटेल असं बोलतात, पण त्याची कृती होत नाही, याचं दुःख होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नरेंद्र मोदींची अश्रू नेमके कुणासाठी?

सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेत नरेंद्र मोदी भावूक झाल्याचा दाखला यावेळी दिला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद रिटायर झाल्यावर त्यांना अश्रू आवरले नाहीत, पण, आमच्या शेतकऱ्यांवर पाणी मारताना त्यांचे अश्रू दिसले नाहीत, त्यामुळे त्यांचे अश्रू नेमके कुणासाठी आहेत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

लॉकडाऊनबाबत प्रशासनाचा निर्णय अंतिम

सध्या पुणे मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना पुन्हा वाढत असून या परिस्थितीत लॉकडाऊन करायचं की नाही. अधिवेशन किती दिवसांचं असेल, हे प्रशासन ठरवेल आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर संजय राठोड प्रकरणाबाबत विचारलं असता, राज्याचे मुख्यमंत्री, महाविकास आघाडी, आणि राज्याचे पोलीस यांच्यावर आपला विश्वास असून खऱ्याला न्याय नक्की मिळेल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

… आणि पवारांबद्दल बोलताना मुश्रीफांना अश्रू अनावर का?

राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, फडणवीसांची जहरी टीका; ठाकरे सरकारला घायाळ करणारे १० मोठे मुद्दे

(NCP MP Supriya Sule slams PM Narendra Modi over Farmer Protest)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.