AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलैपर्यंत मनाई आदेश जारी; तलवार, भाले, बंदुका वापरण्यास मनाई

Thane Police : मनाई आदेशाच्या या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलैपर्यंत मनाई आदेश जारी; तलवार, भाले, बंदुका वापरण्यास मनाई
Virar : बेपत्ता मुलांना शोधण्यासाठी पोलिसांची मुस्कान मोहिम, 361 बेपत्ता मुले मुली बेपत्ताImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2022 | 1:36 PM
Share

ठाणे: शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस (Thane Police) आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे शहर (Thane City)  विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी शहरात 23 जुलै 2022 पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. या कालावधीत कुणालाही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शस्त्र घेऊन कुठेही जाता येणार नाही. तसेच या कालावधीत जाहीरसभा (rally) घेणे, मिरवणुका काढणे आणि घोषणा-प्रतिघोषणा देण्यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मनाई आदेश कालावधीत या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे. 23 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा मनाई आदेश लागू राहणार असल्याचंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

मनाई आदेशाच्या या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

सभा, मिरवणुकांना मज्जाव

सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे आदींनाही मनाई आदेशाच्या काळात मज्जाव असेल. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई आदेश लागू करण्यात आल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

या गोष्टी वगळल्या

लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका यांना हे आदेश लागू नसेल. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, आदींना हे आदेश लागू राहणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

तर कारवाई करणार

हा मनाई आदेश 23 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. पठारे यांनी कळविले आहे.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!