AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीच्या कंडक्टरच्या हाती प्रवाशांच्या जीवाची दोरी, थोडी जरी कमी जास्त खेचली तर…

विठ्ठलवाडी आगारातून सकाळी सात वाजता अमळनेरसाठी एसटी सुटली. कसारा घाटात येताच एसटीच्या एक्सिलेटरचा पेडल तुटला. मग पुढे नाशिकपर्यंतचा भयानक प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

एसटीच्या कंडक्टरच्या हाती प्रवाशांच्या जीवाची दोरी, थोडी जरी कमी जास्त खेचली तर...
विठ्ठलवाडी-अमळनेर एसटीचा जीवघेणा प्रवासImage Credit source: TV9
| Updated on: Apr 20, 2023 | 7:16 PM
Share

कल्याण / सुनील जाधव : विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरच्या दिशेने एसटी बस निघाली. मात्र कसारा घाटात एसटीच्या एक्सलेटरच पेडल तुटला. यानंतर एसटी चालक आणि कंडक्टरने जी शक्कल लढवली ती पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. अखेर दोरीचा वापर करत बस नाशिकला पोहचली. चालक गाडी चालवत होता तर कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये देखील ती बस दुरुस्त केली गेली नाही. त्यात चालक आणि कंडक्टरची तरी काय चूक, बस दुरुस्त केल्या जात नसतील तर एसटी डेपो आहेत तरी कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओमध्ये चालक गाडी चालवत आहे, तर कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हा सर्व प्रकार पाहून बसमधील प्रवाशांचा संताप अधिक विकोपाला गेला. नागरिकांनी गोंधळ घालत धावत्या बसमधली ही दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरला चालली होती बस

कल्याण नजीक असलेल्या विठ्ठलवाडी आगारातून गुरुवारी सकाळी सात वाजता अमळनेरच्या दिशेने राज्य परिवहन मंडळाची एसटी निघाली. कसारा घाटात एसटी येताच एक्सिलेटरचं पेडल तुटलं. बसमध्ये प्रवासी होते. मग वेळेला करणार तरी काय?, त्यामुळे दोरीच्या सहाय्याने गाडी कंट्रोल करण्यात आली. नाशिकपर्यंत चालक अशाच स्थितीत गाडी चालवत होता.

नाशिकमध्ये बस दुरुस्त करण्याचा निष्फळ प्रयत्न केला

नाशिकला पोहचताच मेकॅनिककडून बस दुरुस्त करण्याचा देखील प्रयत्न केला गेला, पण बस दुरुस्त झाली नाही. मग इथून दुसरी बस उपलब्ध करून देण्यासाठी कंडक्टर आणि ड्रायव्हरने प्रयत्न केला. याच बसवर ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’ हे शासनाचे घोषवाक्य लिहिले होते. नागरिकांनी मात्र याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.