AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले

पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे.

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 11:25 PM
Share

कल्याण (ठाणे) : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे. या दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या टीमने तब्बल 24 तासांनंतर बाहेर काढले. विशेष म्हणजे प्रशासनाकडून ठाणे जिल्हा हद्दीत पर्यटकांना नदी, धबधबा आणि तलाव क्षेत्रात जाण्यास मज्जाव करण्यात आलं आहे. तरीही पर्यटक अशा ठिकाणी जात असल्याने प्रशासनाचं लक्ष आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारा 18 वर्षीय इशांत मोहाडीकर आणि 20 वर्षीय विनायक परब हे दोघे गुरुवारी (22 जुलै) मलंगगड भागात अन्य एका मित्रासह फिरण्यासाठी आले होते. चिंचवली परिसरातील नदीत हे दोघे पोहण्यासाठी उतरले. तर त्यांच्या एका मित्राला पोहता येत नसल्याने तो बाहेरच थांबला. मात्र नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने पाण्यात उतरलेले इशांत आणि विनायक हे वाहून गेले.

तब्बल 24 तास शोध मोहिम

संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने काल दिवसभर या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे आज अखेर एनडीआरएफच्या टीमने याठिकाणी येत शोधकार्य सुरू केलं. यावेळी एका तरुणाचा मृतदेह दुपारी साडेबारा वाजता, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह संध्याकाळी साडेपाच वाजता सापडला. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर मलंगगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना रोखणं गरजेचं असल्याचं मत पुन्हा एकदा व्यक्त होतंय.

हेही वाचा :

समोरून मगर, साप जात होते, चिपळूणमध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी सांगितला थरार

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...