AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले

पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे.

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 11:25 PM
Share

कल्याण (ठाणे) : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे. या दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या टीमने तब्बल 24 तासांनंतर बाहेर काढले. विशेष म्हणजे प्रशासनाकडून ठाणे जिल्हा हद्दीत पर्यटकांना नदी, धबधबा आणि तलाव क्षेत्रात जाण्यास मज्जाव करण्यात आलं आहे. तरीही पर्यटक अशा ठिकाणी जात असल्याने प्रशासनाचं लक्ष आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारा 18 वर्षीय इशांत मोहाडीकर आणि 20 वर्षीय विनायक परब हे दोघे गुरुवारी (22 जुलै) मलंगगड भागात अन्य एका मित्रासह फिरण्यासाठी आले होते. चिंचवली परिसरातील नदीत हे दोघे पोहण्यासाठी उतरले. तर त्यांच्या एका मित्राला पोहता येत नसल्याने तो बाहेरच थांबला. मात्र नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने पाण्यात उतरलेले इशांत आणि विनायक हे वाहून गेले.

तब्बल 24 तास शोध मोहिम

संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने काल दिवसभर या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे आज अखेर एनडीआरएफच्या टीमने याठिकाणी येत शोधकार्य सुरू केलं. यावेळी एका तरुणाचा मृतदेह दुपारी साडेबारा वाजता, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह संध्याकाळी साडेपाच वाजता सापडला. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर मलंगगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना रोखणं गरजेचं असल्याचं मत पुन्हा एकदा व्यक्त होतंय.

हेही वाचा :

समोरून मगर, साप जात होते, चिपळूणमध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी सांगितला थरार

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.