AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर

गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरलंय. (barvi dam badlapur)

ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर
barvi dam
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 6:14 PM
Share

ठाणे: गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरलंय. धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत राहिला तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. (Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

मागील चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका, तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याची तहान या धरणातून भागते. यासाठी बारवी धरणातून उल्हास नदीत दररोज पाण्याचा ठरावीक विसर्ग केला जातो. मात्र गेल्या 15 दिवसांपासून उल्हास नदीला पावसामुळे मोठा प्रवाह आला असून त्यामुळं बारवी धरणातून सोडलं जाणारं पाणी बंद करण्यात आलंय. यामुळे धरण वेगाने भरू लागलंय.

आठ-दहा दिवसात धरण भरणार?

2019 साली हे धरण 4 ऑगस्टला भरलं होतं. तर 2020 म्हणजे मागील वर्षी पाऊस काहीसा लांबल्यानं हे धरण 31 ऑगस्टला भरलं होतं. मात्र यंदा गेल्या चार दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलीय. त्यामुळं हे धरण 65.80 मीटर इतकं भरलंय. धरणाची उंची 72 मीटर असून पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुढच्या 8 ते 10 दिवसात हे धरण पूर्णपणे भरेल, अशी अपेक्षा आहे. हे धरण भरल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वर्षभरासाठी मिटणार आहे. (Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

संबंधित बातम्या:

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो!

Mumbai Traffic : मुंबईत पावसाची दाणादाण, ट्रॅफिक जाम झाल्यानं ठिकठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान, पाणी भरलं, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

(Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.