AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर

गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरलंय. (barvi dam badlapur)

ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर
barvi dam
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 6:14 PM
Share

ठाणे: गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 52 टक्के भरलंय. धरणाची पाणीपातळी 65.80 मीटरवर पोहोचली आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच बरसत राहिला तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. (Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

मागील चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही मुसळधार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका, तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याची तहान या धरणातून भागते. यासाठी बारवी धरणातून उल्हास नदीत दररोज पाण्याचा ठरावीक विसर्ग केला जातो. मात्र गेल्या 15 दिवसांपासून उल्हास नदीला पावसामुळे मोठा प्रवाह आला असून त्यामुळं बारवी धरणातून सोडलं जाणारं पाणी बंद करण्यात आलंय. यामुळे धरण वेगाने भरू लागलंय.

आठ-दहा दिवसात धरण भरणार?

2019 साली हे धरण 4 ऑगस्टला भरलं होतं. तर 2020 म्हणजे मागील वर्षी पाऊस काहीसा लांबल्यानं हे धरण 31 ऑगस्टला भरलं होतं. मात्र यंदा गेल्या चार दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलीय. त्यामुळं हे धरण 65.80 मीटर इतकं भरलंय. धरणाची उंची 72 मीटर असून पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुढच्या 8 ते 10 दिवसात हे धरण पूर्णपणे भरेल, अशी अपेक्षा आहे. हे धरण भरल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वर्षभरासाठी मिटणार आहे. (Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

संबंधित बातम्या:

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो!

Mumbai Traffic : मुंबईत पावसाची दाणादाण, ट्रॅफिक जाम झाल्यानं ठिकठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान, पाणी भरलं, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

(Water levels rise at barvi dam supplying water to Thane)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली