सर्वसामान्यांसाठी ‘गोड’ बातमी! फळांची आवक वाढल्याने किंमती घसरल्या, वाचा नवे दर

मुंबई एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढल्याने सफरचंद आणि सीताफळांच्या किंमती घसरल्या आहेत.

सर्वसामान्यांसाठी 'गोड' बातमी! फळांची आवक वाढल्याने किंमती घसरल्या, वाचा नवे दर
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 6:26 PM

मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज एकूण 350 गाड्यांची आवक झाली आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठलं होतं. मात्र, आता फळांची आवक वाढल्यामुळे किंमतींमध्येही घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढल्याने सफरचंद आणि सीताफळांच्या किंमती घसरल्या आहेत. (total 350 vehicles arrived at the Mumbai APMC Fruit Market today)

आज फळ बाजारात सफरचंदाची 11 हजार क्विंटल आवक झाली असून सफरचंदाच्या किंमतीत घसरण झाली आहे. 150 रुपये किलो दराने विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात 60 ते 70 रुपये दराने विकला जात आहे. तर सीताफळाची आवक एक हजार क्विंटल झाली असून सीताफळ 10 ते 30 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तसंच डाळिंबाची आवक 1080 क्विंटल झाली असून 35 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. तर मार्केटमध्ये 2100 संत्रींची आवक झाली आहे. त्यामुळे संत्र्यांच्या भावातही घसरण झाली असून 30 रुपये प्रतिकिलोने बाजारात विकली जात आहे.

सफरचंदाचे भाव घसरले हिमाचल, काश्मीर, शिमला, कुनुर या ठिकाणांहून सफरचंदाची मोठी आवक फळ मार्केटमध्ये झाल्याने सफरचंदाचे भाव घसरले आहेत. मात्र, किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळे दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे. (total 350 vehicles arrived at the Mumbai APMC Fruit Market today)

सीताफळाची आवक वाढली सोलापूर, अकोला, नगर, शिरूर या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात सीताफळाची आवक झाली आहे. तसेच सध्या फळ बाजारात हनुमान, गोल्डन, सुपर गोल्डन, काटेरी बाळापुरी, महानगरी अशा वेगेळ्यावेगळ्या प्रकारच्या सीताफळाची विक्री केली जात आहे. मात्र, एपीएमसी फळ मार्केटमध्ये सीताफळामध्ये किडे असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गोल्डन सीताफळ या प्रकारच्या सीताफळामध्ये किडे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सीताफळाचे दर हे घसरले असून सध्या मार्केटमध्ये सीताफळ हे 10 ते 30 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत.

सीताफळाच्या पिकाला पिकवण्यासाठी पाणी कमी प्रमाणात वापरले जाते. मात्र, परतीच्या पावसाने सीताफळाच्या पिकाला चांगलंच झोडपून काढलं आहे. योग्य वेळी योग्य ती काळजी न घेत पिकांवर कीटकनाशकांची फवारणी काहीजण करत नाहीत. परिणामी फळांमध्ये काही काळाने किडे पडण्यास सुरुवात होते. महत्वाचे म्हणजे गोल्डन सीताफळामध्ये किडे पाडण्याचे प्रकार जास्त आहेत असे एपीएमसीमधील फळ व्यापारी नितीन चस्कर यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या –

सावधान! मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, N95 बनावट मास्कच्या कारखान्याचा पर्दाफाश

US Election 2020: ट्रम्प यांचा जय-पराजय सोन्याच्या किमतीवर अवलंबून?, दिवाळीत 3 ते 6 टक्क्यांनी वाढेल सोनं?

(total 350 vehicles arrived at the Mumbai APMC Fruit Market today)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.