AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध
छगन भुजबळ, मंत्री.
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 1:42 PM
Share

नाशिकः काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणाऱ्या व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच. राज्यात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद आहे, असा दावा सोमवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शहरातील अनेक दुकाने उघडी आहेत. त्यामुळे येवल्यात तरी व्यावसायिक आणि दुकानदारांनी या बंदला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. याबद्दल मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये मंत्रिपुत्राने शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्या घटनेचा निषेध म्हणून आणि आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणाऱ्या व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच, असा दावा त्यांनी केला. भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र बंदला विरोध करण्याच्या तुरळक घटना घडल्या असतील. मात्र, त्याचा बंदवर काहीही परिणाम झाला नाही. हा बंद शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. दर ठरवण्याची मोनोपली मोडून काढणे, शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या मुळावर असणारे आहेत. शेतकऱ्यांच्या हमीभाव आंदोलनाला यश मिळेल. लखीमपूर हिंसाचारात भाजप मंत्रिपुत्र असल्याने या आंदोलनाला भाजपचा विरोध असणाराच. यावर पंतप्रधान एक शब्दही बोलायला तयार नाहीत. मात्र, या संपामुळे शेतकऱ्यांची एकजूट होईल, असा दावा त्यांनी केला.

उद्योग आघाडीचा विरोध

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपच्या उद्योग आघाडीने विरोध केला आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. दुकान बंद करण्यास बळजबरी झाली तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून गुन्हे दाखल करू, असा इशारा पेशकर यांनी दिला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जरूर आंदोलन करावे. मात्र, आधीच कोरोनाने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दबावाखाली न ठेवता व्यापार सुरू ठेवावा, असे आवाहन पेशकार यांनी केले आहे.

शेतकरी संघटनाही दूर

लखीमपूर हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेनेही विरोध दर्शवला आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जात आहे. हे भांडण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आहे. यात शेतकऱ्यांना सुळावर दिले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी केला आहे.

लखीमपूरमध्ये मंत्रिपुत्राने शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्या घटनेचा निषेध म्हणून आणि आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही व्यापारी आम्हाला मानणारे आहेत. काही व्यापारी भाजपला मानणारे आहेत. त्यामुळे भाजपला मानणाऱ्या व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला विरोध असणारच. हे प्रमाण तुरळक आहे. त्याचा बंदवर काहीही परिणाम झाला नाही. – छगन भुजबळ, मंत्री

इतर बातम्याः

नवरात्रोत्सवः नाशिक ते कोटमगाव जगदंबा माता मंदिरापर्यंत सायकल रॅली, 9 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे अथक प्रयत्न

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण; कोरोनाच्या 783 रुग्णांवर उपचार सुरू

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.