AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं नवं नाव?; काय म्हणाले ठाकरे?

सरकार आपल्या दारी असं सरकार म्हणते. शेतकऱ्याचं किती नुकसान झाले. पंचनामे झाले, मात्र मदत मिळाली का ? असा सवाल करतानाचे उद्धव ठाकरे यांनी आता याबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांचे पाव-पाव उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाच जाब विचारला पाहीजेत असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं नवं नाव?; काय म्हणाले ठाकरे?
Uddhav ThackerayImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 22, 2024 | 6:40 PM
Share

गणेश सोलंकी, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा | 22 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री, शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा येथे भाजपावर जोरदार टीका केली. गद्दारांना हमीभाव आहे, परंतू माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. जिल्ह्यातील 550 गावात अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरु झालेली नाहीत. पंतप्रधानांच्या किती योजनांचा फायदा झाला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोदी भाजपाचे पंतप्रधान म्हणून भाषणे करीत आहेत. त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करावे असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

देशात जीवाला जीव देणारी माणसे राहीली नाहीत. मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. तुम्हाला भेटल्यानंतर कुटुंबाला भेटल्याचा आनंद होतो. जनसंवाद होतो. त्या गद्दारांना त्यांचे 50 खोके लख लाभो. चिन्ह, पक्ष चोरला, कपाळावरचं भाग्य, शिक्का तर कोणी चोरू शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले. लोणार येथील अन्न विषबाधा घटनेत उपचारासाठी डॉक्टर देखील उपलब्ध  नव्हते अशी परिस्थिती आहे.

भाजपाच्या पोटात शिवसैनिक लाथा घालतील

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की हो मी कॉंग्रेस सोबत गेलो. कारण भाजपाने वचनाचा भंग केला. मी माझ्यासाठी नव्हे शिवसेनेसाठी मुख्यमंत्री द्या म्हटले होते. अडीच-अडीच वर्षे ठरले होते. शब्द तुम्ही मोडला. मी कोणालाही फसविले नाही. लुबाडले नाही. आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही. मोदीजी तुम्हाला वाजपेयी कचऱ्यात टाकणार होते. मात्र बाळासाहेबांनी वाचविले असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गुजरातला तु्म्ही जरुर समृद्ध करा. परंतू महाराष्ट्राला ओरबाडून करु नका, असे कराल तर भाजपाच्या पोटात शिवसैनिक लाथा घालतील अशी टीका त्यांनी यावेळी केली.

आजपासून निवडणूक आयोगाचं नाव…

ईडी, सीबीआय भाजपाचे घरगडी म्हणून काम करीत आहेत. परंतू आमचं सरकार आल्यावर आम्ही देखील पाहून घेऊ काय करायचे ते असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला. भाजपा आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना एकच सांगतो, की तुमची मेहनत कुठे गेली, कारण आयात केलेल्या लोकांना उमेदवारी मिळणार असल्याचे ते म्हणाले. गद्दारांची शिवसेना मानत नाही आणि आजपासून निवडणूक आयोगाचे नवे नाव धोंड्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारी यंत्रणा आणि त्यांचा गैरवापर करणाऱ्या भाजपा सरकारवर चढविला.

विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.
शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली, त्यावर निर्णय घेऊ; राऊत स्पष्टच बोलले
शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली, त्यावर निर्णय घेऊ; राऊत स्पष्टच बोलले.
एकच चर्चा होती ताईंना दादांच्या जागी घेतलं पाहिजे! झिरवळ काय म्हणाले?
एकच चर्चा होती ताईंना दादांच्या जागी घेतलं पाहिजे! झिरवळ काय म्हणाले?.
अजितदादांच्या दुर्घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी गावाची गावबंद हाक
अजितदादांच्या दुर्घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी गावाची गावबंद हाक.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार.