AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द…उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात देण्यात आली असून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द...उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray
| Updated on: Aug 11, 2025 | 1:31 PM
Share

महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. आता या आंदोलनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. राज्यात क्रिडा नाही तर रमी मंत्री असल्याचे त्यांनी म्हणत जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्हात आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.

सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय ज्या तुम्ही घोषणा दिल्या, पण त्यांना डोकं असलं पाहिजे ना. कारण हे बिनडोक्याचे फक्त पाय आहेत. सुरतला पळून जायला आणि गुहाटीला पळून जायला. डोकं कुठे आहे? नुकतं खोकं आहे डोकं नाहीच. डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते फक्त खोके घेऊन बसले आहेत. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा सुरू आहे आणि आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत.

या जुलूमशाहीच्या विरोधात आता जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल. लाज एका गोष्टीची वाटते, आपण दरवेळी सांगतो की, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र. नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. असा गाैरवशाली आपला महाराष्ट्र या आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे. बाकी भ्रष्टाचाराच्या रांगेत एक नंबरला आहेत. जर भ्रष्टाचाराची रांग लावली तर पहिल्या नंबरला. पण विकास आणि नितीमत्ता पाहिले तर महाराष्ट्र शेवटच्या रांगते.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, अरे खरोखर लाज वाटते तुमची आम्हाला…आजपर्यंतची परंपरा आहे की, जर कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चाैकशीला सामोरे जावे लागते. मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी एका मंत्र्यावर वाईट आरोप होते, तो कोण हे तुम्हालाही माहिती आहे. त्याला सुद्धा वनवासात पाठवले ना? मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळी पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतले ना. आता यांचे पैसे गिळणारी भूक आहे, जनताभी मूक नाहीच.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!