वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज रस्त्यावर, शिवसेना आमदाराचीही साथ

जिल्ह्यातील हजारो वंजारी समाजाचे नागरिक मोर्चात (Vanjari Arakshan Morcha Nashik) सहभागी झाले होते. शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनीही या मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज रस्त्यावर, शिवसेना आमदाराचीही साथ
Follow us
| Updated on: Sep 11, 2019 | 5:23 PM

नाशिक : वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Vanjari Arakshan Morcha Nashik) काढण्यात आला. दोन टक्क्यांवरून 10 टक्यांपर्यंत आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील हजारो वंजारी समाजाचे नागरिक मोर्चात (Vanjari Arakshan Morcha Nashik) सहभागी झाले होते. शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांनीही या मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

आधी मराठा मोर्चा, नंतर पुन्हा धनगर मोर्चा आणि आता वंजारी मोर्चामुळे सरकारसमोर नवीन संकट उभं राहणार आहे. आरक्षणावरून निघालेल्या या मोर्चांमध्ये युवकांची संख्या लक्षणीय आहे. वाढीव आरक्षण मिळावं यासाठी नाशिकच्या वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणातून निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. वाढीव आरक्षणासोबतच गोपीनाथ मुंडे महामंडळाची स्थापना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह यांसारख्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं मोर्चेकऱ्यांनी सांगितलं.

मोर्चात हजारो वंजारी बांधव आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर आले होते. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 12 डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आमदार नरेंद्र दराडे यांनी सांगितलं. यापूर्वीही बीडमध्ये वंजारी समाजाने भव्य मोर्चा काढला होता. राज्यभरात वाढीव आरक्षणासाठी मोर्चे सुरु झाले आहेत.

नेमकी मागणी काय आहे?

राज्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. शिवाय राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात वंजारी समाजाच्या मतदान प्रक्रियेवर विधानसभेची निवडणूक लढवली जाते. 1995 मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला ओबीसीमधून काढून एनटीमध्ये स्वतंत्र समावेश केला. त्यावेळी दहा टक्के आरक्षण अटीला होते. पण एनटीमध्ये अ,ब,क आणि ड तयार केल्यामुळे वंजारी समाजाला नोकऱ्यात कमी जागा मिळायला लागल्या.

जिथे 100 जागा असतील, तिथे केवळ दोन जागांवर वंजारी समाजाला समाधान मानावं लागत आहे. त्यामुळेच आता वंजारी समाजाने एल्गार पुकारलाय. सरकारने वंजारी समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर करावं, तसं न झाल्यास पुन्हा ओबीसीत समाविष्ट करून घ्यावं, अशी मागणी करत वंजारी समाजाने राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.