AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाचा फटका: भाज्यांचे भाव घसरले; कांद्याचेही मोठे नुकसान

धुकं, सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होऊन भाजीपाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरले आहेत. शहरातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळं भाजी पाल्याच्या खरेदीस ग्राहकांची वर्दळ ही कमी झाली आहे.

अवकाळी पावसाचा फटका:  भाज्यांचे भाव घसरले; कांद्याचेही मोठे नुकसान
Vegetable-Image
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 9:44 AM
Share

पुणे- राज्यभर पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. धुकं, सातत्यानं सुरु असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्याप्रमाणात  नुकसान होऊन भाजीपाल्याचे भावात 40 ते 50 टक्क्यांनी घसरले आहेत. शहरातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळं भाजी पाल्याच्या खरेदीस ग्राहकांची वर्दळ ही कमी झाली आहे.

काय आहेत भाज्यांचे भाव

पुणे मार्केटयार्डमध्ये मटार 20 रुपये किलो, मिरची 10 ते 12 रूपये किलो, बीट 20 रुपये, काकडी 20 रुपये, गाजर 15 रुपये किलो,कोथिंबीर 6 ते 7 रुपये,मेथी 8 ते 10 रुपये, पालक 15 रुपये, वांगी 25 ते 30 रुपये किलो आहेत. मागील आठवड्यात ८० ते १०० किलो असलेला टोमॅटो 25 ते 30 रुपये किलोवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतमालाचे भाव गडाडल्याने शेतमाल अत्यंतकिरकोळ भावत विक्री सुरु केली आहे.

कांद्याचेही मोठे नुकसान पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कांद्याचे लिलाव होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस आल्याने हे नुकसान झाले असून खेड बाजार समितीकडे कांदा ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने यात कांदा उत्पादक शेतकरी भरडला आहे.

पाळीव जनावरांचेही मोठे हाल 

काल दिवसभर पाऊस आणि थंड हवेची लाटेमुळं जनावरांना थंडीची बाधा होत जनावरे आजारी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी थेट गोठ्यात शेकोट्या पेटवून आपल्या बैलजोडी आणि जनावरांना ऊब निर्माण करावी लागत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाड्याना पळणाऱ्या बैलांची संख्या आणि बैलगाडा मालकांची मोठी संख्या आहे. या सर्व बैलगाडा प्रेमींनी गोठ्यात शेकोटी पेटवली आहे.

आफ्रिकेतून ठाण्यात 27 जण आले, सर्वाधिक नवी मुंबईत, आरोग्य विभाग अलर्टवर, 42 जणांचा शोध

रायगडावर पर्यटकांना 7 डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी, राष्ट्रपतींच्या भेटीनिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु

Param Bir Singh | परमबीर सिंग यांची गच्छंती अटळ, निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही?

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.