AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोंबडीवड्यांवरून राजकारण तापलं, ‘कोंबडी चोरांना…’, शिवसेना ठाकरे गटाचा राणेंना खोचक टोला

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती, या टीकेनंतर आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

कोंबडीवड्यांवरून राजकारण तापलं, 'कोंबडी चोरांना...', शिवसेना ठाकरे गटाचा राणेंना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2025 | 6:19 PM
Share

भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. जेव्हा उद्धव ठाकरे येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि माशे ठेवू नका असं मी सर्व हॉटेल वाल्यांना सांगितलं आहे.  मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, असा हल्लाबोल राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता, दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच  तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?  

नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते. पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही. उतरत्या वयात आहेत. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. साठी बुद्धी नाटी तसं त्यांचं झालं आहे. आम्हाला कोणाला काही त्याचा फरक पडत नाही. परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलात मिळतात असं नाही, तर कोकणातील प्रत्येक घरांमध्ये कोंबडी वडे मिळतात, आणि या कोंबडीचोरांना कोंबडीवड्याचं महत्त्व काय कळणार. पण कोकणातील माणूस आणि उद्धवजी ठाकरे यांचं जे नात आहे, ते कोंबडी वड्यावर अवलंबून नाही. पण उद्धव ठाकरे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील, असा घणाघात यावेळी विनायक राऊत यांनी राणेंवर केला आहे. दुसरीकडे अरविंद सावंत यांनी देखील राणेंना यावरून खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले सावंत? 

नारायण राणे कोण आहेत, ते कुठल्या पक्षात आहेत. त्यांची सर्व वक्तव्य काढा, ज्यांची दखल कोणीच घेत नाही, ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वक्तव्य तुम्ही सांगता. राणेंची महाराष्ट्र दखल घेत नाही, आणि घेऊही नाही, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

राणे काय म्हणाले होते? 

अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा, नाही तर मी तुम्हाला देतो. त्यातील किती पैसे त्यांनी सिंधुदुर्गाला दिले. मग कळेल त्यांना काय अधिकार आहे, कोकणाबद्दल बोलायचा आणि कोकणात यायचा. मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडीवडे आणि माशे बंद, ज्या दिवशी उद्धव ठाकरे येतील त्या दिवशी. ते कोकणासाठी दुसरं काहीही करत नाहीत, ते फक्त तेवढेच खायला इकडे येतात, असं राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू