AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Flood : वर्ध्यातील यशोदा नदीच्या पुरात बैलबंडी गेली वाहून, जनावरांच्या शेपटीला पकडून 3 शेतकरी निघाले बाहेर

पुराचा अंदाज न आल्यानं बैलबंडीवरील तिन्ही शेतकरी पुरात वाहून गेले. सोबत गाय व गोऱ्हा होता. एका शेतकऱ्यानं गायीच्या शेपटीला हात पकडला. दुसऱ्याने गोऱ्याच्या शेपटीला हात पकडला. हे हात पक्के धरून ठेवले. जनावर पोहून पुरातून बाहेर निघाले.

Wardha Flood : वर्ध्यातील यशोदा नदीच्या पुरात बैलबंडी गेली वाहून, जनावरांच्या शेपटीला पकडून 3 शेतकरी निघाले बाहेर
वर्ध्यातील यशोदा नदीच्या पुरात बैलबंडी गेली वाहून
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 7:26 PM
Share

वर्धा : हिंगणघाट तालुक्यात मागील तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे यशोदा नदी (Yashoda River) दुथडी भरून वाहू लागली. नदीला पूर आला आहे. मनसावळी परिसरात पुराच्या पाण्यात बैलगाडीसह बैल वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने ३ शेतकरी थोडक्यात बचावले. सिरसगाव येथील तीन शेतकरी शेतातून बैलगाडी घेऊन नदी पार करीत होते. मात्र, अचानक यशोदा नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. बैलगाडीसह बैलगाडीवर असलेले पांडुरंग कुभलकार (Pandurang Kubhalkar), आर्यन येसंबरे, विनायक उरकुडे (Vinayak Urkude) हे तिन्ही शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अशात बैलगाडी नदीत उलटली. पुढील तीन-चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. वीज कोसळून होणाऱ्या आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी दामिनी अँप वापरावे, असे आवाहन वर्धा जिल्हा प्रशासनाने केले आहे.

एक बैल गेला, दुसरा बचावला

यावेळी शेतकरी बैलगाडीच्या खाली पडले. बचावासाठी गाय व गोऱ्याची शेपटी पकडून तिन्ही शेतकऱ्यांनी कसाबसा आपला जीव वाचविला. मात्र, पुराच्या पाण्यात बैलगाडी व दोन बैल वाहून गेले. याप्रसंगी मनसावळी येथील वाल्मिकी दुरुगवार, अजय सुरजुसे, किसना साटोने, संजय सटोने या भोई समाजाच्या युवकांनी एका बैलाला जिवंत व एकाला मृतावस्थेत नदीबाहेर काढून बैलबंडीलाही काढले. सुदैवाने तिन्ही शेतकरी थोडक्यात बचावले.

नेमकं काय घडलं

पुराचा अंदाज न आल्यानं बैलबंडीवरील तिन्ही शेतकरी पुरात वाहून गेले. सोबत गाय व गोऱ्हा होता. एका शेतकऱ्यानं गायीच्या शेपटीला हात पकडला. दुसऱ्याने गोऱ्याच्या शेपटीला हात पकडला. हे हात पक्के धरून ठेवले. जनावर पोहून पुरातून बाहेर निघाले. त्यांच्या साह्याने तिन्ही शेतकरी बाहेर निघू शकले. जनवारे नसती तर वेगळं चित्र राहीलं असतं. या जनावरांमुळंच आपण वाचू शकल्याचं शेतकरी सांगतात. अन्यथा या पुरात पोहून बाहेर निघणे कठीण होते.

पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

वर्धा जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत हवामान अंदाजानुसार, पुढील तीन दिवस जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. नागरिकांनी सतत पाऊस सुरु असताना बाहेर पडू नये. विजांचा कडकडाट होत असताना विशेष खबरदारी बाळगावी.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.