AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ध्यातील चार अल्पवयीन मुलं बेपत्ता, सेलू पोलिसांत तक्रार

कामावरून घरी आले तेव्हा त्यांना मुलगा घरी दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

वर्ध्यातील चार अल्पवयीन मुलं बेपत्ता, सेलू पोलिसांत तक्रार
मसाळा येथील बेपत्ता चार मुलं गेली कुठं?Image Credit source: t v 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 25, 2022 | 4:08 PM
Share

महेश मुंजेवार, Tv9 मराठी प्रतिनिधी, वर्धा : सेलू तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येतेय. चार अल्पवयीनं मुलं काल घरून बेपत्ता झालीत. याप्रकरणी सेलू पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. पोलीस तपास करत आहेत. रेल्वेस्थानकावर ही मुलं काल संध्याकाळी फिरताना दिसली. ती गांधीधाम एक्सप्रेसमध्ये बसतानाचे फुजेट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या दिशेनं पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत.

मुलं संध्याकाळी गेलीत, ती परतलीच नाहीत

काल शनिवारची मुलांची शाळा होती. शाळेतून घरी आल्यानंतर पालक शेतात गेले. सकाळी अकरा वाजतानंतर मुलं घरी होती. पालक शेतातून संध्याकाळी घरी आले तेव्हा मुलं दिसून आले नाहीत. त्यामुळं मुलांचा शोध घेण्यात आला. पण, गावात किंवा नातेवाईकांकडे ही मुलं दिसली नाहीत. त्यामुळं पालकांनी सेलू पोलिसांत तक्रार दाखल केली.

पप्पू देवढे (वय 13 वर्ष), राज येदानी (वय 13 वर्ष), राजेंद्र येदानी (वय 12 वर्ष), संदीप भुरानी (वय 8 वर्ष) अशी बेपत्ता मुलांची नाव आहेत. शनिवारी पप्पू देवढे याला शाळेतून सकाळी 11 वाजता त्यांच्या वडिलांनी घरी आणून ते शेतात निघून गेले.

रेल्वेने गेल्याचा पोलिसांचा अंदाज

कामावरून घरी आले तेव्हा त्यांना मुलगा घरी दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी तक्रारीवरून दाखल केला. पोलिसांकडून मुलांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुजेट तपासले. या फुटेजमध्ये ही मुलं रेल्वेस्थानकावर फिरताना दिसली. अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसमध्ये गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या रेल्वेनं पुढील स्टेशनवर ती गेली असावीत, असा अंदाज आहे.

मुलांना पळवून नेले नाही

वर्धा पोलीस म्हणतात, हा घातपात नाही. किंवा कुणी मुलांना पळवून नेलं नाही. गांधीधाम एक्सप्रेसवर ही मुलं निघून गेली आहेत. रेल्वेस्थानकावर ही मुलं फिरतानाचे फुटेज आहेत. संध्याकाळच्या वेळी ही मुलं या रेल्वेस्थानकावर होती. ती ज्या दिशेनं गेलीत त्या दिनेश पोलीस पथक रवाना झाले आहेत. तपास सुरू आहेत.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ