AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Rain Damage : पावसामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करत अहवाल सादर करा, आमदार रणजित कांबळे यांचे प्रशासनाला निर्देश

नदीकाठच्या काही गावामध्ये पाणीपुरवठा योजनाही पुराच्या वेढ्यात सापडल्या आहेत. पूर ओसरल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असतो. यामुळे नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणामाची शक्यता आहे.

Wardha Rain Damage : पावसामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करत अहवाल सादर करा, आमदार रणजित कांबळे यांचे प्रशासनाला निर्देश
आमदार रणजित कांबळे यांचे प्रशासनाला निर्देशImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 10, 2022 | 9:00 PM
Share

वर्धा : मागील एका आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे देवळी मतदारसंघातील देवळी (Deoli), वर्धा, हिंगणघाट (Hinganghat) या तालुक्याच्या विविध भागात अतिवृष्टीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहाने, नदी नाल्याच्या पुराने शेती (Agriculture) अक्षरश: खरडून निघाली आहे. अनेक गावांतील नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी शिरले. त्यामुळेही मोठे नुकसान झाले आहे. काही गावांना पुराने वेढा घातला आहे. नैसर्गिक आपत्तीत जीवीतहानीही झाली आहे. काही शेतकर्‍यांच्या बैलजोडी, जनावरे, शेती उपयोगी साहित्यही पाण्यात वाहून गेले.

नुकसानीचे पंचनामे करावेत

नुकसान शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरत आहे. काही गावात पुराचे पाणी घरामध्ये गेल्याने अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासधुस झाली आहे. नागरिकांना तातडीने राशन पुरविणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी कच्च्या घरांचेही नुकसान होत आहे. या बाबींचा विचार करुन शेतकर्‍यांचे झालेले पिकांचे नुकसान, खरडून निघालेली जमीन, घरात पाणी शिरल्याने झालेले नुकसान, वीज पडल्याने व पुराच्या पाण्यात वाहून गेलेले तसेच जनावरांच्या झालेल्या नुकसानीचा स्थानिक अधिकार्‍यांच्या हस्ते पंचनामा करत तातडीने उपाययोजना कराव्या. केलेल्या पंचनाम्याचा आणि उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आमदार रणजित कांबळे यांनी दिले आहेत.

टँकरने पाणीपुरवठा करा

नदीकाठच्या काही गावामध्ये पाणीपुरवठा योजनाही पुराच्या वेढ्यात सापडल्या आहेत. पूर ओसरल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असतो. यामुळे नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणामाची शक्यता आहे. ज्या गावामध्ये जलशुद्धीकरण केंद्र नाही, अशा गावांना गरज असल्यास टँकरने पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही निर्देश आमदार कांबळे यांनी दिलेत. पावसामुळे पूर येऊन अनेक ठिकाणी रस्ते, पुलांची दुरवस्था झाली आहे. अनेक गावांतील रस्ते, पूल खचल्याची माहिती मिळाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करत अहवाल तयार करावा. नुकसान झालेल्या भागात पर्यायी उपाययोजना करत नागरिकांना दिलासा द्यावा. कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही आमदार कांबळे यांनी दिले आहेत.

कच्च्या घरांकडे लक्ष द्या

ज्या गावांमध्ये कच्चे घर आहेत. अशा घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. संततधारमुळे कच्च घरात पाणी मोठ्या प्रमाणात रिचते . जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा ही कच्ची घरे पडत नसून काही दिवसांनी क्षतीग्रस्त होतात. त्यामुळे अश्या घरांना सुद्धा मदतीत समाविष्ट करत याबाबीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना आमदार रणजित कांबळे यांनी पत्रातून दिल्या.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.