AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : देशावर मोठं अस्मानी संकट, यंदा मान्सूनचा पाऊस घाम फोडणार, पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

गेल्यावेळी वेळेआधी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान त्यानंतर आता देशासह राज्यात यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज आता समोर आला आहे. या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे.

Weather update : देशावर मोठं अस्मानी संकट, यंदा मान्सूनचा पाऊस घाम फोडणार, पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
2026 Monsoon ForecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 3:40 PM
Share

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतामधील अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र भारतामधील शेती ही प्रमुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी होते, त्याचा पिकांना फटका बसतो, तर कधी-कधी पाऊसच पडत नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रामध्ये अडकतात. पावसाच्या असमान प्रमाणामुळे सध्या भारतामधील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता. अनेक राज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. यामधून महाराष्ट्र देखील सुटला नाही. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दरम्यान यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज समोर आला आहे, मात्र यामुळे आता चिंतेत भर पडली आहे. जागतिक हवामान संघटनेकडून यावर्षीचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

जागतिक हवामान संघटना (WMO) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी भारतामध्ये मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या भाकीतामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. महाराष्ट्रातही यावेळी अल नीनोचा प्रभाव पहायला मिळू शकतो, त्यामुळे राज्यातही पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर यावर्षी मात्र उन्हाचा कडाका चांगलाच जाणवणार आहे. यावर्षी तापमानात मोठी वाढ पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक हवामान संघटनेकडून देण्यात आला आहे.

मात्र यामध्ये दिलासादायक गोष्ट म्हणजे काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तरी अल नीनोच्या प्रभाबाबत कोणताही अंदाज वर्तवणं हे घाईचं ठरू शकतं. मात्र देशात पावसाची परिस्थिती काय असणार? अल नीनोचा देशातील पावसाला कितपत फटका बसणार? याच चित्र मे नंतरच स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे सध्या चिंता करण्याचं कारण नाही, मात्र या वर्षी पावसावर अल नीनोचं सावट आहे.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.