AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : देशावर मोठं अस्मानी संकट, यंदा मान्सूनचा पाऊस घाम फोडणार, पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

गेल्यावेळी वेळेआधी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान त्यानंतर आता देशासह राज्यात यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज आता समोर आला आहे. या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे.

Weather update : देशावर मोठं अस्मानी संकट, यंदा मान्सूनचा पाऊस घाम फोडणार, पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
2026 Monsoon ForecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 3:40 PM
Share

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतामधील अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र भारतामधील शेती ही प्रमुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी होते, त्याचा पिकांना फटका बसतो, तर कधी-कधी पाऊसच पडत नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रामध्ये अडकतात. पावसाच्या असमान प्रमाणामुळे सध्या भारतामधील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता. अनेक राज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. यामधून महाराष्ट्र देखील सुटला नाही. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दरम्यान यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज समोर आला आहे, मात्र यामुळे आता चिंतेत भर पडली आहे. जागतिक हवामान संघटनेकडून यावर्षीचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

जागतिक हवामान संघटना (WMO) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी भारतामध्ये मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या भाकीतामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. महाराष्ट्रातही यावेळी अल नीनोचा प्रभाव पहायला मिळू शकतो, त्यामुळे राज्यातही पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर यावर्षी मात्र उन्हाचा कडाका चांगलाच जाणवणार आहे. यावर्षी तापमानात मोठी वाढ पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक हवामान संघटनेकडून देण्यात आला आहे.

मात्र यामध्ये दिलासादायक गोष्ट म्हणजे काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तरी अल नीनोच्या प्रभाबाबत कोणताही अंदाज वर्तवणं हे घाईचं ठरू शकतं. मात्र देशात पावसाची परिस्थिती काय असणार? अल नीनोचा देशातील पावसाला कितपत फटका बसणार? याच चित्र मे नंतरच स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे सध्या चिंता करण्याचं कारण नाही, मात्र या वर्षी पावसावर अल नीनोचं सावट आहे.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...