AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका; दीपक केसरकर यांचा सल्ला काय?

ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालना-अंबड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात प्रचंड टीका केली आहे. सरकारला त्यांनी धारेवर धरीत जाब विचारला आहे. त्यावर मंत्री दिपक केसरकर यांनी भुजबळ यांना सल्ला देत एकदा सरकारने आश्वासन दिल्यानंतर अशी वक्तवे करणे बंद करावे असे म्हटले आहे.

भुजबळ यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका; दीपक केसरकर यांचा सल्ला काय?
deepak kesarkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2023 | 9:43 PM
Share

गिरीश गायकवाड, मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी जालनाच्या ओबीसी एल्गार सभेत शेलक्या शब्दात टिका केली आहे. त्यास मनोज जरांगे यांनी जशास तशी टीका करून प्रत्युत्तर दिले आहे. स्वत:च्या सरकारला घरचा आहेर देत भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर वेळीच कारवाई न केल्याने त्यांची हिमंत वाढल्याची टिका केली. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे. त्यामुळे कोणाच्याही आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोणीही वेगवेगळी विधाने करण्याची गरज नाही. आता हे सगळं थांबवण महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचा सल्ला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.

ओबीसीतून सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालना-अंबड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात प्रचंड टीका केली आहे. सरकारला त्यांनी धारेवर धरीत जाब विचारला आहे. त्यावर विचारता मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. आता कोणी वेगवेगळी विधाने करण्याची गरज नाही. ते सगळे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. परंतू एकदा सरकारने सांगितले आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. तेव्हा आता हे सगळे थांबविणे महाराष्ट्राच्या हिताचे असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

श्रेय घेणे योग्य नाही

कोणाही व्यक्तीविरोधात काही आक्षेप असतील तर त्याविरोधात पोलिसात तक्रार करायला हवी अशा प्रकारे कोणावरीही हल्ला करणे योग्य नाही असे नामदेव जाधव हल्ला प्रकरणी प्रतिक्रीया देताना सांगितले. आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्या प्रकरणावर बोलताना केसरकर यांनी काम पूर्ण झाल्यानंतर आपण केवळ फिती कापायच्या हे बंद केले पाहीजे. रस्त्यावर सुरक्षा पट्टे रंगवायचे बाकी होते. फक्त श्रेय हे बरोबर नाही अशी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना मिठ्या

तुम्ही मंत्रालयात रोज गेला असता तर बाळासाहेबांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी मणिशंकर विरोधात मुंबई बंद केली आणि तुम्ही सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना मिठ्या मारता, हिंदु धर्माचा अपमान करणाऱ्या स्टॅलिनच्या मुलाला भेटता. कारण स्टॅलिन आपल्या प्रचाराला यावे असे आदित्य ठाकरेंना वाटते इंडीया आघाडीच्या नेते आले त्यांना घेऊन तुम्ही बाळासाहेबाच्या स्मृतीस्थळावर गेलात का ? एक शिवसैनिक गेला तर तुम्ही घोषणाबाजी करता अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Follow Us
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?